काँग्रेस ८, उबाठा ६, शरद पवार गट ३ जागा लढवणार

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम; लवकरच उमेदवार जाहीर करणार


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या रिक्त जागांसाठी महाविकास आघाडीचा (मविआ) जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर झालेल्या या तडजोडीत काँग्रेसला सर्वाधिक ८ जागा मिळाल्या असून, उबाठा ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या जागावाटपाची अधिकृत माहिती दिली असून, मविआ सर्व १७ जागांवर पूर्ण ताकदीने लढणार असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.येत्या १ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मविआच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत विजयी झाल्याने त्यांनी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे जाहीर झालेल्या नागपूरच्या पोटनिवडणुकीसह एकूण ८ जागांवर काँग्रेस आपले नशीब आजमावणार आहे.



मविआचा फॉर्म्युला




  •  काँग्रेस (एकूण ८ जागा) : चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव आणि नागपूर (पोटनिवडणूक).

  • उबाठा (एकूण ६ जागा) : कोकण, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नाशिक.

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट (एकूण ३ जागा) : पुणे, ठाणे आणि सांगली-सातारा.

Comments
Add Comment

Water hyacinth : पवई तलावातील जलपर्णी आता कायमची हद्दपार..

तलावाच्या विहार पथाचा विकास सी एस आर निधीतून.. मुंबई: मुंबई महापालिकेच्या पवई तलावात सांडपाण्याच्या

Eknath Shinde : ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!

वर्धापनदिनी एकनाथ शिंदे यांचे 'ऑपरेशन टायगर'वरून सूचक विधान; तुडवण्याची भाषा करणाऱ्यांचे पाय जागेवर ठेवणार

Supreme Court : चालण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात चालण्याचा हक्क हा संविधानातील मूलभूत अधिकार असल्याचे

Monsoon : राज्यात २५ जूननंतर मान्सून सक्रीय होणार, हवामान खात्याचा नवा अंदाज

मुंबई : देशभरात मान्सूनच्या प्रगतीने पुन्हा एकदा मोठी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे. सलग तिसऱ्या वर्षी

NDA : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एनडीए दिसणार भक्कम

नवी दिल्ली : संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात एनडीएचे शक्ती संतुलन विरोधकांवर वरचढ ठरणार आहे. एनडीएचा आकडा २९८

Ban on Telegram : टेलिग्रामवरील बंदी २२ जूनपर्यंत कायम

नवी दिल्ली: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म 'टेलिग्राम'ला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. केंद्र