Nautapa Health Alert : पुढील सहा दिवस हे पदार्थ खाणे टाळा नाहीतर....

राज्यात नवतपाला सुरुवात होताच उष्णतेचा कहर वाढला आहे. कडक ऊन, गरम वारे आणि वाढता उकाडा यामुळे शरीरावर मोठा ताण येत आहे. अशा परिस्थितीत चुकीचा आहार घेतल्यास आरोग्याची गंभीर निर्माण समस्या होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते,नवतपादरम्यान काही पदार्थ खाल्ल्याने शरीराचे तापमान अधिक वाढते आणि डिहायड्रेशन, हिटस्ट्रोक, उलट्या, जुलाब, अशक्तपणा यांसारख्या त्रासांचा धोका वाढतो.


तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा


उन्हाळ्यात बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, फरसाण, समोसे यांसारखे तळलेले आणि तेलकट पदार्थ शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. हे पदार्थ पचवण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि थकवा जाणवतो. तसेच जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थांमुळे घाम अधिक येतो व शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे डिहायड्रेशनचा धोक्का अधिक वाढतो.


कोल्डड्रिंकपासून सावध राहा


उकाड्यात अनेक जण थंडावा मिळावा म्हणून कोल्डड्रिंक, सोडा किंवा एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, या पेयांमधील साखर जास्त असते आणि कॅफिन शरीराला डिहायड्रेट करू शकते. चहा आणि कॉफीचे अतिसेवनही शरीरातील पाणी कमी करून उष्णतेचा त्रास वाढवू शकते.


रेड मीट आणि पॅकेज्ड स्नॅक्स घेणे टाळा


रेड मीट पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते. याशिवाय चिप्स, वेफर्स, पॅकेज्ड स्नॅक्स यात जास्त मीठ असतो. अधिक सोडियममुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होऊ शकते.


शिळे अन्न खाणे टाळा


नवतपाच्या काळात उघड्यावर ठेवलेले जेवण किंवा खाण्याचे पदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे फूड पॉयजनिंग, जुलाब, उलट्या अशा आजारांचा धोका वाढतो. तसेच अतिशय थंड पदार्थ किंवा मद्यपान केल्यास शरीरावर उलटे परिणाम होऊ शकतात.


मग काय खाल्लं पाहिजे?


तज्ज्ञांच्या मते, नवतपादरम्यान शरीर थंड आणि हायड्रेट ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी नारळपाणी, ताक, लस्सी, सत्तू (Sattu flour), कलिंगड, काकडी आणि ताजी फळे फायदेशीर ठरतात. दिवसभर भरपूर पाणी पिणे आणि रिकाम्या पोटी बाहेर न पडणेही गरजेचे आहे. योग्य आहार आणि काळजी घेतल्यास नवतपाच्या तीव्र उष्णतेपासून स्वताचे संरक्षण करणे शक्य होऊ शकते.

Comments
Add Comment

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप येथील मल जल शुध्दीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होवून येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर

Ind vs Afg : भारताने अफगाणिस्तान विरूद्धची वन डे सीरिज २-० अशी जिंकली, दुसऱ्या मॅचमध्ये मोठ्या फरकाने बाजी मारली

लखनऊ : भारताने अफगाणिस्तान विरूद्धची वन डे सीरिज २-० अशी जिंकली. पहिली वन डे सात विकेट्स राखून आणि दुसरी वन डे १७०

Cricket : टीम इंडिया 'ए' ची फायनलमध्ये धडक; अफगाणिस्तानचा १०१ धावांनी धुव्वा

दांबुला : प्रियांश आर्या, तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर आणि निशांत सिंधूच्या

Vidhan Parishad : राज्याच्या विधानपरिषदेतील ११ जागांसाठी गुरुवारी मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील उर्वरित अकरा जागांसाठी गुरुवारी मतदान

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या