Nitesh Rane : हिंदुराष्ट्रात रस्त्यावर नमाज पठन खपवून घेणार नाही!

- मंत्री नितेश राणे यांचा इशारा; नियम मोडला तर 'बकरी ईद' तुरुंगात


मुंबई : "हिंदुराष्ट्रात" सार्वजनिक रस्त्यांवर नमाज पठण खपवून घेतले जाणार नाही. रस्ते हे नागरिकांना चालण्यासाठी आणि वाहतुकीसाठी आहेत. जर कुणी नियमांचे उल्लंघन करून राज्यात शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची पुढची 'बकरी ईद' तुरुंगातच साजरी होईल", असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी दिला. मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होई. (Nitesh Rane)



राज्यभरात गोहत्या आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी सरकारने कठोर पावले उचलली असून, नियम मोडणाऱ्यांवर थेट 'मोक्का'अंतर्गत कारवाई केली जाईल, असेही राणे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, "ज्या राज्यांमध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे, तिथे रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही. जर तुम्हाला रस्त्यावरच नमाज पढायचा असेल, तर मग मशिदी आणि मदरशांना कायमचे टाळे ठोकून द्या. रस्ते हे लोकांसाठी, रहदारीसाठी असतात. तुम्ही आधी बेकायदेशीर बांधकामे करता, 'लँड जिहाद'च्या नावाखाली जमिनी हडपता आणि मग तुम्हाला नमाजसाठी रस्तेही हवे असतात. मात्र, आमच्या 'देवाभाऊंच्या' महाराष्ट्रात अशी हिंमत कुणीही करू नये", असेही ते म्हणाले. (Nitesh Rane)



'वंदे मातरम' म्हणा, अन्यथा पाकिस्तानात जा!


मंत्री नितेश राणे म्हणाले, "लँड जिहाद असो वा लव्ह जिहाद, या सर्व प्रकारांवर आणि मदरशांवर आमचे अत्यंत बारीक लक्ष आहे. तिथून दहशतवादी निर्माण होणे थांबवायचे असेल, तर आधी मुल्ला-मौलवींसह सर्वांना 'वंदे मातरम' शिकवणे सुरू करा. तुम्ही भारतात राहता, त्यामुळे या देशाचा झेंडा आणि 'वंदे मातरम'चा सन्मान करणे तुमचा अधिकार आणि कर्तव्य आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांनी ते म्हटलेच पाहिजे. ज्यांना 'वंदे मातरम' म्हणायचे नसेल, त्यांना पाकिस्तानात पाठवण्याची आमची पूर्ण तयारी आहे. जो 'वंदे मातरम' न म्हणण्याची हिंमत करेल, त्याची पुढची सकाळ पाकिस्तानात होईल", असा इशाराही राणे यांनी दिला. (Nitesh Rane)



...तर थेट मोक्का लागणार : 


बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या नव्या शासन आदेशाचा संदर्भ देत राणे म्हणाले, "आमच्या सरकारने नुकताच एक जीआर काढला आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारची गोहत्या किंवा बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्यास थेट 'मोक्का' लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे पूर्ण अधिकार दिले आहेत. या निर्णयाची १०० टक्के अंमलबजावणी सरकार करणार आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानणाऱ्या या हिंदुराष्ट्रात कुणी नियम मोडले किंवा शरिया कायदा आणण्याचा प्रयत्न केला, तर ते थेट जेलची हवा खाताना दिसतील आणि त्यांची पुढची बकरी ईद तुरुंगातच जाईल," असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात