Nitesh Rane : वापरात नसलेल्या जहाजांमधून कोट्यवधींचा महसूल; मंत्री नितेश राणेंकडून ‘शिप रीसायकल’ धोरणाला गती

मुंबई : राज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापर प्रक्रियेला गती देत महसूलवाढीस चालना देण्यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने जहाज पुनर्वापरासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केले.


मंत्रालयात जहाज पुनर्वापरासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच श्री राम ग्रीन शिप रिसायकलिंग इंडस्ट्रीज Shree Ram Green Ship Recycling Industries (Unit-II) LLP चे प्रतिनिधी उपस्थित होते. (Nitesh Rane)



यावेळी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले की, राज्यातील अनेक बोटी आणि जहाजे दीर्घकाळ वापरात नसल्याने ती बंदर परिसरात पडून आहेत. अशा जहाजांच्या पुनर्वापरातून पर्यावरण संरक्षणास मदत होण्यासोबतच स्क्रॅप प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर महसूलही मिळू शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेसाठी सक्षम आणि पारदर्शक धोरण तयार करण्यावर सरकार भर देत आहे.



त्यांनी संबंधित कंपनीला राज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापराबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः इनलँड व्हेसल आणि मोठ्या जहाजांसाठी ‘वन विंडो सिस्टीम’ विकसित करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे निर्देशही देण्यात आले. या प्रणालीमुळे जहाज पुनर्वापर प्रक्रियेला वेग मिळेल, तसेच आवश्यक परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. (Nitesh Rane)



यासंदर्भात विभागाकडून सखोल अभ्यास केला जाणार असून आगामी बोर्ड बैठकीत याबाबतचा अहवाल मांडण्यात येणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. तसेच स्क्रॅपमध्ये काढण्यात येणाऱ्या बोटी आणि जहाजांची शॉर्टलिस्ट तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. (Nitesh Rane)


या उपक्रमामुळे राज्यातील सागरी क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून जहाज पुनर्वापर उद्योगाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केला. रोजगारनिर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि महसूल वाढ या तिन्ही बाबींमध्ये हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या

Mumbai Rain Alert : गरज असेल तरच घराबाहेर पडा!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; दुपारनंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता मुंबई : "गेल्या काही तासांपासून

Kashedi landslide: मुसळधार पावसाचा फटका; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यासह अनेक भागांतील रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम

Mumbai rain news : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला, सरकारी कार्यालये अर्धा दिवस सुरू राहणार

मुंबई : मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे मार्ग ठप्प! दरड कोसळली, एक्स्प्रेस वेसह रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम

मुंबई : मुंबई, पुणे आणि लोणावळा (Lonavala) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (Expressway),