Air India : एअर इंडिया मुंबईहून देशांतर्गत उड्डाणे कमी करणार, २८० साप्ताहिक उड्डाणे करणार रद्द

मुंबई : एअर इंडिया १ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत मुंबईहून २८० साप्ताहिक देशांतर्गत उड्डाणे कमी करणार. ही कंपनीकडून देशांतर्गत क्षमतेत केलेली पहिली मोठी कपात आहे. याआधीच कंपनीने आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्येही कपात केली होती. सुधारित वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर झाले नाही. या निर्णयाबाबत एअर इंडियाकडे ई-मेलद्वारे प्रतिक्रिया मागवण्यात आली, मात्र बातमी छापेपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नव्हता.



सूत्रांच्या माहितीनुसार, टाटा समूहाच्या मालकीची ही विमान कंपनी मुंबईहून अनेक महत्त्वाच्या महानगर आणि प्रमुख मार्गांवरील उड्डाणांची वारंवारता कमी करणार आहे. यामध्ये दिल्ली मार्गावर सर्वाधिक परिणाम होणार असून ५० साप्ताहिक उड्डाणे कमी केली जाणार आहे. तरीही या मार्गावर जवळपास ३०० साप्ताहिक सेवा सुरू राहतील. अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता या मार्गांवर प्रत्येकी सुमारे २१ साप्ताहिक उड्डाणे कमी केली जाणार आहे. तसेच व्यवसायिक प्रवासासाठी महत्त्वाचा असलेल्या बेंगळुरू मार्गावरही २१ उड्डाणांची कपात होणार असून एकूण वारंवारता ७०च्या खाली येईल. याशिवाय मुंबईहून नागपूर, वाराणसी, पाटणा आणि भोपाळ या शहरांसाठीची उड्डाणे या दोन महिन्यांसाठी तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. ही कपात मागील वर्षाच्या तुलनेत थोडी अधिक आहे. मुंबई एअर इंडियासाठी एक महत्त्वाचे देशांतर्गत हब असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. हा निर्णय वाढलेले विमान इंधन दर, वाढती ऑपरेशनल खर्चाची दडपण आणि पावसाळ्यातील तुलनेने कमी प्रवासी मागणी यामुळे घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

India Women won : दीप्तीची कमाल, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय

बर्मिंगहॅम : अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माच्या फिरकीची जादू आणि उपकर्णधार स्मृती मानधनाच्या झंझावाती

Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली

मोरेना : मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील हेतमपूर - घेर विभागाजवळ अफवा पसरल्यामुळे रेल्वे रुळावर मोठी

Metro : मेट्रो-४ मोगरपाडा कारडेपो मार्गासाठीचा मार्ग मोकळा

मुंबई : मुंबई मेट्रो-४ आणि ४ए वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली-गायमुख या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी ठाणे

Narendra Modi : नाविन्यता भारताच्या डीएनएमध्येच

फ्रान्समधील 'भारत इनोव्ह्हेट्स' सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन नाईस (फ्रान्स) : भारताच्या तरुणांची

Mohan Bhagvat : आपण हिटलर नाही, संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत

दत्तात्रेय होसबळेंच्या विधानाला मोहन भागवत यांचे समर्थन तिरुवनंतपुरम : पाकिस्तानशी संवादाची दारे खुली ठेवली

Nitesh Rane : ऐतिहासिक सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : मंत्री नितेश राणे

सावंतवाडी : ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर वसलेले हे संस्थान कालीन शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी माझे