Air India : एअर इंडिया मुंबईहून देशांतर्गत उड्डाणे कमी करणार, २८० साप्ताहिक उड्डाणे करणार रद्द

मुंबई : एअर इंडिया १ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत मुंबईहून २८० साप्ताहिक देशांतर्गत उड्डाणे कमी करणार. ही कंपनीकडून देशांतर्गत क्षमतेत केलेली पहिली मोठी कपात आहे. याआधीच कंपनीने आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्येही कपात केली होती. सुधारित वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर झाले नाही. या निर्णयाबाबत एअर इंडियाकडे ई-मेलद्वारे प्रतिक्रिया मागवण्यात आली, मात्र बातमी छापेपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नव्हता.



सूत्रांच्या माहितीनुसार, टाटा समूहाच्या मालकीची ही विमान कंपनी मुंबईहून अनेक महत्त्वाच्या महानगर आणि प्रमुख मार्गांवरील उड्डाणांची वारंवारता कमी करणार आहे. यामध्ये दिल्ली मार्गावर सर्वाधिक परिणाम होणार असून ५० साप्ताहिक उड्डाणे कमी केली जाणार आहे. तरीही या मार्गावर जवळपास ३०० साप्ताहिक सेवा सुरू राहतील. अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता या मार्गांवर प्रत्येकी सुमारे २१ साप्ताहिक उड्डाणे कमी केली जाणार आहे. तसेच व्यवसायिक प्रवासासाठी महत्त्वाचा असलेल्या बेंगळुरू मार्गावरही २१ उड्डाणांची कपात होणार असून एकूण वारंवारता ७०च्या खाली येईल. याशिवाय मुंबईहून नागपूर, वाराणसी, पाटणा आणि भोपाळ या शहरांसाठीची उड्डाणे या दोन महिन्यांसाठी तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. ही कपात मागील वर्षाच्या तुलनेत थोडी अधिक आहे. मुंबई एअर इंडियासाठी एक महत्त्वाचे देशांतर्गत हब असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. हा निर्णय वाढलेले विमान इंधन दर, वाढती ऑपरेशनल खर्चाची दडपण आणि पावसाळ्यातील तुलनेने कमी प्रवासी मागणी यामुळे घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात