Food poisoning from Aamras : पाकिटबंद आमरस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा

अहिल्यानगर : मुंबईत कलिंगड खाऊन विषबाधा झाल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. पण मृतांच्या शरीरात उंदीर मारण्याचे औषध आढळले आणि विषबाधेचे कारण वेगळे असल्यामुळे पोलीस तपासाची दिशाच बदलली. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच अहिल्यानगर जिल्ह्यात पाकिटबंद आमरस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये एक चार वर्षांची चिमुरडी आहे.



वेळेत उपचार मिळाल्यामुळे विषबाधा झालेल्या सात जणांपैकी सहा जणांना तीन दिवसांनंतर डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली आहे.



विषबाधा झालेल्या सर्वांना आमरस खाल्ल्यानंतर चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. कुटुंबातील एक व्यक्ती जेवणासाठी उशिरा आली त्यामुळे इतरांना त्रास झाल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात आले. या व्यक्तीनेच विषबाधा झालेल्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी धावपळ केली. बेशुद्ध पडलेल्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळेच परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली.



आमरस खाल्ल्याने विषबाधा झालेल्यांवर एशियन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सचिन पांडुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आमरस तयार करण्यासाठी वापरलेले आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यात आले होते. हे आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. या कॅल्शियम कार्बाईडचाच परिणाम झाला आणि आमरस विषारी झाला असा संशय डॉक्टर सचिन पांडुळे यांनी व्यक्त केला.


नागरिकांनी शक्यतो नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे खावे. बाजारातून आणलेले आंबे पाण्याने स्वच्छ धुवावे. नंतरच खावे, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Comments
Add Comment

महापौरांच्या दालनात शिरुन विरोधी पक्षनेत्यांची कर्मचाऱ्यांना दमदाटी

महापौरांनी केला घुसखोरीचा आरोप, पोलिसांत नोंदवणार तक्रार मुंबई  (Mumbai): मुंबई महापौर रितू तावडे या कार्यालयात

रुग्ण संवाद, उपचार आणि चिकित्सेसाठी आता वैद्य एआय विकसित

रूग्णालय तसेच दवाखान्याच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर प्रणालीचा वापर मुंबई : रूग्णांशी संबंधित रक्तचाचणी

Ketan Agrawal Murder Case : ...अखेर खेळ उलटला! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनला दिलासा, कोर्टाने मागणी फेटाळली

सिया चेतनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पोलिसांची मागणी फेटाळली पुणे : केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder Case) प्रकरणात

Sassoon Dock : फिनलँडच्या कंपन्यांच्या सहकार्याने होणार ससून डॉकचे आधुनिकीकरण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री नितेश राणे यांच्यात बैठक

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक ससून डॉकचे (Sassoon Dock) डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरण करून त्याला जागतिक दर्जाचे व

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून