Food poisoning from Aamras : पाकिटबंद आमरस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा

अहिल्यानगर : मुंबईत कलिंगड खाऊन विषबाधा झाल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. पण मृतांच्या शरीरात उंदीर मारण्याचे औषध आढळले आणि विषबाधेचे कारण वेगळे असल्यामुळे पोलीस तपासाची दिशाच बदलली. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच अहिल्यानगर जिल्ह्यात पाकिटबंद आमरस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये एक चार वर्षांची चिमुरडी आहे.



वेळेत उपचार मिळाल्यामुळे विषबाधा झालेल्या सात जणांपैकी सहा जणांना तीन दिवसांनंतर डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली आहे.



विषबाधा झालेल्या सर्वांना आमरस खाल्ल्यानंतर चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. कुटुंबातील एक व्यक्ती जेवणासाठी उशिरा आली त्यामुळे इतरांना त्रास झाल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात आले. या व्यक्तीनेच विषबाधा झालेल्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी धावपळ केली. बेशुद्ध पडलेल्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळेच परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली.



आमरस खाल्ल्याने विषबाधा झालेल्यांवर एशियन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सचिन पांडुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आमरस तयार करण्यासाठी वापरलेले आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यात आले होते. हे आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. या कॅल्शियम कार्बाईडचाच परिणाम झाला आणि आमरस विषारी झाला असा संशय डॉक्टर सचिन पांडुळे यांनी व्यक्त केला.


नागरिकांनी शक्यतो नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे खावे. बाजारातून आणलेले आंबे पाण्याने स्वच्छ धुवावे. नंतरच खावे, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Beed Suicide News : बीडमध्ये धक्कादायक घटना; आईची 4 वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी

बीड (Beed) जिल्ह्यातील शिदोड गावातून एक काळीज पिवटाळून टाकणारी घटना समोर आली आहे. 25 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या 4

Nashik : नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून विसर्ग वाढ; गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : नाशिक शहर आणि परिसरात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मात्र तीन दिवस सुरु

Security tightened : राज्यातील संवेदनशील ठिकाणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता आणि आगामी राजकीय मोर्चे लक्षात घेता महाराष्ट्र

Ashadhi Wari : वारकऱ्यांसोबत रांगेत उभे राहून भरत गोगावले यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन; आनंदवारी उपक्रमालाही दिली भेट

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा'; मंत्री भरतशेठ गोगावले यांची आनंदवारीत सेवाभावी चरणसेवा पंढरपूर  : आषाढी

Nashik Simhastha Kumbh Mela : कावनाई येथे रविवारी सिंहस्थ महाकुंभ भूमिपूजन व गंगा-गोदावरी पूजन

Nashik Simhastha Kumbh Mela : श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्ट, श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ, स्वर्ग आश्रम, सिंहस्थ कुंभमेळा मूळ

Nashik : 'मिशन ग्रीन मान्सून'चा पाचवा टप्पा प्रभागागणिक, आतापर्यंत ८,७५० रोपांची मागणी; क्यूआर नोंदणी केलेल्या नागरिकांना देशी वृक्षांची रोपे

Nashik : 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या 'मिशन ग्रीन मान्सून'ला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद