Mumbai : राज्यात पुढील ७२ तास विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. ब्रह्मपुरी येथे शनिवारी तब्बल ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र मान्सून महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ पोहोचल्याने २७ मे नंतर उष्णतेची तीव्रता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागांत पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मान्सून वेगाने पुढे सरकत असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात त्याची प्रगती चांगली होत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते.
शिर्डी : साईबाबांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा खासगी तोफखाना कारखाना उभारण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ...
दरम्यान, विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. ब्रह्मपुरीनंतर अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्येही प्रचंड उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने झाडाखाली उभे राहू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.