नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. जवळपास वर्षभरानंतर होत असलेल्या या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी आपल्या पाच देशांच्या परदेश दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर लगेचच ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत काही मोठे निर्णय घेतले जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंबई : देशभरात सध्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवातीला अनेकांनी हा प्रकार केवळ विनोद किंवा ...
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरांबाबत सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. इंधनाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारकडून दिलासा देणाऱ्या उपाययोजना जाहीर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज होणाऱ्या या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि इतर राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळ आणि संघटनात्मक फेरबदलाच्या चर्चांदरम्यान ही बैठक होत असल्याने तिचे राजकीय महत्त्वही अधिक वाढले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत विविध मंत्रालयांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून अलीकडील महत्त्वाच्या निर्णयांचे परिणाम आणि पुढील काळातील रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.
मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या ‘मेटा’ने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत तब्बल ८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी ...
सरकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे कशी करता येईल, नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवून देता येईल आणि विविध विभागांमध्ये समन्वय कसा वाढवता येईल, यावरही बैठकीत विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच, केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेतला जाऊ शकतो.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ऊर्जा, कृषी, खते, विमान वाहतूक, जहाजबांधणी आणि लॉजिस्टिक्स या महत्त्वाच्या क्षेत्रांवर बैठकीत विशेष चर्चा होऊ शकते. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक आणि वस्तूंच्या किमतींवर होत असल्याने सरकार विविध मंत्रालयांना परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक निर्देश देऊ शकते.
ठाणे : ठाणे पश्चिममधील नौपाडा परिसरातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटच्या इमारतीला गुरुवारी पहाटे भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली ...
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यानंतरच संबंधित मंत्रालयांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. आजच्या बैठकीत त्या निर्देशांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला जाऊ शकतो.
मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना ...
आज संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीतून नेमके कोणते निर्णय समोर येतात आणि सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.