Bandra News : वांद्रे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवणाऱ्यांवर दगडफेक, ६ पोलीस आणि ४ आंदोलक जखमी

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेत ४ पोलीस कर्मचारी आणि ६ आंदोलक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर भाभा रुग्णालय आणि व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार करण्यात आले.



मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेकडून वांद्रे टर्मिनसजवळील गरीब नगर, बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होती. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवत आंदोलन केले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर जमावाकडून पोलिसांवर आणि कारवाई पथकावर दगडफेक करण्यात आली.


या दगडफेकीत पोलीस कर्मचारी विपुल विजयकुमार कदम (३९), मनीष भीमराव बच्छाव (४४), जितेंद्र कुमार सतेंदर (४५), नवनाथ अण्णा मुदगुळ (४५), ओंकार दीपक कोळी (३९) आणि चंद्रकांत ढाम्बळे (४५) जखमी झाले. यापैकी जितेंद्र कुमार सतेंदर यांना व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. इतर पोलिसांनी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला.



तसेच आंदोलकांपैकी वैभव गीते (२५), फिजान अनवाज खान (२२), ए. रशीद खान (१७) आणि अन्सार अली बेग (४९) हे जखमी झाले. अन्सार अली बेग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित जखमींनी उपचारानंतर रुग्णालय सोडले.


या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Bandra News : वांद्रे परिसरातील जागेवरील कारवाईदरम्यान राडा; जमावाला रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर भागात अवैध बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सलग

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :