कोकणातील दुर्गम व डोंगराळ भागातील नेटवर्कसाठी नव्याने सर्वेक्षण; मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्कच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी, भारत संचार निगमचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त सहभागातून तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच त्यावर आधारित कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क आणि ४जी सुविधांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस चिपळूनचे आमदार शेखर निकम, महाआयटीच्या संचालक श्रीमती भुवनेश्वरी एस., महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, विभागाचे अवर सचिव योगेश गोसावी तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे संबंधित निवासी जिल्हाधिकारी, भारत संचार निगमचे अधिकारी अमित पाटील उपस्थित होते.


या बैठकीत देवरुखसह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोबाईल रेंज नसल्याची समस्या आमदार शेखर निकम यांनी मांडून प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये नेटवर्कच उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. डोंगराळ भागांमध्ये प्रत्यक्षात नेटवर्कची गंभीर समस्या कायम असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावर मंत्री ॲड. शेलार यांनी प्रत्येक तालुक्यात “कनेक्टिव्हिटी दरबार” आयोजित करण्याची संकल्पना मांडली. या उपक्रमात भारत संचार निगमचे अधिकारी, स्थानिक आमदार, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी होऊन प्रत्यक्ष समस्यांची नोंद करण्याचे निर्देश त्यांनी दिले.या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७४६ गावांपैकी ७०४ गावांना मोबाईल कव्हरेज असून ६७७ गावांमध्ये ४जी सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले तर रत्नागिरी जिल्ह्यातील १५३८ गावांपैकी १४७२ गावांमध्ये मोबाईल कव्हरेज आणि १४६१ गावांमध्ये ४जी सेवा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. अनेक अनकव्हर्ड गावांचा समावेश भारत संचार निगमच्या ४जी सॅच्युरेशन प्रकल्पात करण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.


जिल्ह्यातील सर्वच भागात उत्तम नेटवर्क कनेक्टिव्हीटीसाठी तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करून कोणती गावे सॅच्युरेशन प्रकल्पात समाविष्ट करायची, कोणत्या ठिकाणी नवीन टॉवर आवश्यक आहेत आणि काम किती कालावधीत पूर्ण होणार याचा सविस्तर रोडमॅप तयार करण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले. यास भारत संचालक निगमचे कोल्हापूर विभागाचे प्रमुख श्री.पाटील यांनी या उपक्रमासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन अंतिम कृती आराखडा सादर करण्याचेही निर्देश मंत्री ॲङशेलार यांनी दिले.

Comments
Add Comment

Short Film : राज्य शासनाकडून बालचित्रपट निर्मितीला चालना; माहितीपट व लघुपटांसाठी अर्थसहाय्यात मोठी वाढ

मुंबई, राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Suraj Chavan : लवकरच आई-बाबा होणार सुरज-संजना; डोहाळेजेवणाचे खास फोटो-व्हिडीओ व्हायरल

मुंबई : 'Bigg Boss Marathi 5' चा विजेता (Winner) आणि लोकप्रिय रीलस्टार (Reel Star) सुरज चव्हाण (Suraj Chavan) आणि त्याची पत्नी संजना गोफणे (Sanjana Gofane)

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Nashik : दोन्ही हात गमावले, तरी न्यायासाठी तीन महिन्यांपासून वणवण !

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एम. के. फोर्जिंग कंपनीत झालेल्या भीषण अपघातात दोन्ही हात गमावलेल्या कामगाराला

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा