Sunetra Pawar : राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य शमवण्यासाठी सुनेत्रा पवारांनी बोलावली कार्यकारिणीची बैठक

वरिष्ठ नेत्यांमधील विसंवाद दूर करणार; आमदारांशी साधणार व्यक्तिगत संपर्क


मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेले नाराजीनाट्य आणि आमदारांमधील वाढती अस्वस्थता दूर करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार अखेर ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रांमधील घोळ आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांना साईडलाईन केल्याच्या चर्चेमुळे पक्षात मोठे बंड होण्याची चिन्हे आहेत. हे नाराजीनाट्य वेळेत शमवण्यासाठी उपमुMumख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने पक्षाच्या कोअर कमिटीची आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांमधील विसंवाद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, सुनेत्रा पवार स्वतः सर्व आमदारांशी व्यक्तिगत संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.



अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी पक्षाची सर्व सूत्रे हाती घेतली असली, तरी निर्णय प्रक्रियेवरून पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगासोबत सुरू असलेला पत्रप्रपंच थेट पार्थ पवार हाताळत असल्याची चर्चा आमदारांमध्ये सुरू आहे. "सुनेत्रा वहिनींची सही आणि पार्थ पवारांची शाई" अशा पद्धतीने सध्या पक्षाचा कारभार सुरू असून सुनेत्रा पवार मुलाला रोखू शकत नसल्याने पक्षात संभ्रम वाढला आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांसारखे दिल्ली दरबारी वजन असलेले नेते जर सोबत नसतील, तर पक्षाचे भविष्यच अंधारात येईल, अशी भीती आमदारांना सतावत आहे.




आमदार संभ्रमात
Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत