Sunday, May 17, 2026

Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या विक्रमाची नोंद केली. या सामन्यात किंग विराट कोहलीने ५८ धावांची अर्धशतकी खेळी करत ५०० धावांचा आकडा पार केला. विराटने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर याला मागे टाकले. विराट कोहलीने ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, यामध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. मागील सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली होती. या सामन्यातील ५८ धावांच्या खेळीसह त्याने ५२४ धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने २०११ साली पहिल्यांदा आयपीएलमध्ये ५०० धावा पूर्ण केल्या आणि ५५७ धावा केल्या. त्यानंतर २०१३ मध्ये ६३४, २०१५ मध्ये ५०५ धावा केल्या. पण २०१६ चा हंगाम अविस्मरणीय ठरला, त्याने ४ शतकांसह ऐतिहासिक ९७३ धावा केल्या. त्याने २०१८ मध्येही ५००+ धावांचा टप्पा गाठला आणि नंतर सलग २०२३ मध्ये ६३९ धावा आणि २०२४ मध्ये ७४१ धावा करत पुन्हा ५०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. नवव्यांदा कोहलीने आयपीएलध्ये ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने पंजाब किंग्स विरुद्धचे सर्व ३७ टी २० सामने फक्त आयपीएलमध्येच खेळले आहेत. त्यामुळे तो आयपीएल इतिहासात एकाच फ्रँचायझीविरुद्ध १२०० धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे आणि त्याने आपली बादशाहत आणखी मजबूत केली आहे. पंजाबविरुद्ध त्याचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर नाबाद ११३ धावा आहे. कोहलीनंतर या यादीत इतर फलंदाजांची नावे येतात, पण किंग कोहलीच्या सातत्यापुढे सगळेच मागे पडले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >