Mumbai Janganana : मुंबईकर गावाला, घराला टाळी आणि बंद घराची पाहणी करायला येणार जनगणनेचे कर्मचारी?

घरयादी व घरगणना मोहिमेला शनिवार पासून प्रारंभ, सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आयुक्तांचे नागरिकांना आवाहन


मुंबई : जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घरयादी व घरगणनेच्या प्रक्रियेला शनिवार, १६ मे २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ही मोहीम १४ जून २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत नियुक्त प्रगणक घरोघरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करणार आहेत. प्रगणकांच्‍या घर भेटीदरम्‍यान नागरिकांनी त्यांना अचूक, संपूर्ण व योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच, ज्यांनी स्व-नोंदणी केली आहे त्यांनी आपला स्व - गणना क्रमांक प्रगणकांना देणे आवश्यक आहे. घरयादी व घरगणना मोहिमेसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रधान जनगणना अधिकारी आश्विनी भिडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे उन्हाळी सुट्टीमुळे अनेक कुटुंब गावी गेली आहेत. तर काहीजण बाहेरगावी गेलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या घराला टाळी लागलेली असणार. त्यामुळे या बंद घरांची पाहणी करायला हे कर्मचारी जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.



जनगणना ही देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. अचूक माहितीच्या आधारे शासनाला योग्य नियोजन करता येते आणि नागरिकांपर्यंत विकासाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवता येतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून प्रामाणिक व अचूक माहिती देऊन जनगणना २०२७ च्‍या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. घरयादी व घरगणना ही जनगणनेची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असून, या प्रक्रियेत घरांची संख्या, कुटुंबातील सदस्यांची माहिती तसेच उपलब्ध मूलभूत सुविधांची नोंद केली जाते. या माहितीच्या आधारे शासन विविध विकास आराखडे, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीची जाणीव ठेवून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक असल्‍याचे आश्विनी भिडे यांनी नमूद केले आहे.


जनगणेसाठी संकलित केली जाणारी सर्व माहिती ही पूर्णपणे गोपनीय राखली जाते आणि ती केवळ शासकीय नियोजनासाठीच वापरली जाते. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता विश्वासाने आणि निःसंकोचपणे योग्य माहिती द्यावी. नागरिकांचे सहकार्य हेच महानगराच्‍या आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरेल, असा विश्‍वासही आश्विनी भिडे यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Comments
Add Comment

Nalasopara Murder Case : धक्कादायक! ५ महिन्यांपासून बेपत्ता गँगस्टरचा अखेर उलगडा; ड्रेनेज चेंबरमधून सापडला मानवी सांगाडा

नालासोपारा :  गेल्या ५ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या कुख्यात गँगस्टर रवि बिडलान (Ravi Bidlan Murder Case) प्रकरणात मोठा

Municipal Schools : महापालिका शाळांमधील मुलांसाठी वह्या, स्टेशनरी आणि गणवेश खरेदीला मान्यता

शालेय साहित्य खरेदीला विलंब, मुलांना मिळणार उशिराने मुंबई : मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात

Mumbai Waste Management : भायखळा ते शीव पर्यंतचा भाग लोटला जाणार कचऱ्यात

सलग दुसऱ्यांदा कचरा खासगीकरणाचा प्रस्ताव फेटाळला मुंबई : मुंबईतील कचऱ्याचे खासगीकरण करण्याच्या सर्व

Mumbai News: वाकोला-बीकेसी पुलाबाबत मोठी बातमी! ९८% काम पूर्ण, मुंबईकरांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत

मुंबई:मुंबई शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (SCLR)

KEM Hospital : प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्येही एमआरआयसह सीटी स्कॅनची सुविधा वाढवा

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली मागणी मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) एमआरआय (MRI)

Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan and Zoo : राणीबागेत आता ई-बग्गीतुन फिरता येणार पर्यटकांना!

बच्चे कंपनींसाठी आकर्षक डबल डेकर बसचीही सुविधा मुंबई : जिजामाता उद्यानात फिरणे आता अधिक आरामदायी आणि