BMC Electric Vehicles (EV) : मुंबई महापालिकेच्या ताफ्यात केवळ ४२ इलेक्ट्रिक वाहने

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर इंधन बचतीकरता अनेकांनी वाहनांचा ताफा कमी करून तसचे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास सुरुवात केली असली तरी प्रत्यक्षात मुंबई महानगरपालिकेच्या ताफ्यात निव्वळ ३६ इलेक्ट्रिक वाहने आहेत, तर सहा पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहने अशाप्रकारची हायब्रीड व्हेहीकल आहेत. त्यामुळे महापालिकेच्यावतीने आपल्या वाहनांचा ताफा वाढवतानाइलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात नसून यासाठी आता प्रशासनाला आता ईव्ही बनवणाऱ्या कंपन्यांचाच वाहनांचा अवलंब करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.



मुंबई महापालिकेच्या ताफ्यात सध्या २२० वाहने असून त्यातील पेट्रोल व इलेक्ट्रीक संयुक्त आधारीत ०६ वाहने तर निव्वळ इलेक्ट्रीक ३६ वाहनांचा समावेश आहे. या ३६इलेक्ट्रीक वाहनांचा वापर सध्या खातेप्रमुख व विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून केले जात आहे. ही इलेक्ट्रिक वाहने एका चार्जिंगमध्ये सरासरी २८० किलोमीटर सेवा देतात. तर भाडेतत्वावरील एकूण ३५० वाहनांची सेवा घेतली जाणार असून त्यातील ७० वाहने ही निव्वळ इलेक्ट्रीक वाहने आहेत. अशाप्रकारची वाहने खरेदी केल्यानंतर त्यांची चार्जिंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. सध्या मुंबई महापालिकेच्यावतीने २० ठिकाणी ३२ चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई महापालिकेला इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगकरता सीएनजीच्या पंपांच्या धर्तीवर चार्जिंगची व्यवस्था केलेले केंद्र उभारण्यावर भर द्यावा लागेल असे बोलले जात आहे.


पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने २३.०७.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२१ जाहीर केले आहे. तसेच या शासन निर्णयान्वये धोरणामधील विविध प्रोत्साहने व अंमलबजावणीची विभागनिहाय जबाबदारी सोपविण्यात आली असून परिवहन विभागास नोडल विभाग म्हणून जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२१ च्या अंमलबजावणीचा कालावधी ३१. मार्च २०२५ पर्यंत होता. पण ०१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० या कालावधीकरिता महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. पण या नव्या धोरणामुळे प्रत्यक्षात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढण्यास विलंब झाला. अन्यथा सन २०२१नंतर आज खऱ्या अर्थाने शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित वापरात येणारी वाहने तसेच खासगी तसेच खासगी वाहनांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झाली असती. आज देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यासाठी प्रत्येक जण पुढे येत असले तरी प्रत्यक्षात या वाहनांची संख्या कमी असल्यामुळे याचा पूर्ण क्षमतेने वापर करता येत नाही. महापालिकेत सध्या हे प्रमाण एकूण वाहनांच्या २० टक्के एवढे राखण्याचे लक्ष्य ठेवण्यात आला असला तर सध्या १८ टक्के एवढाच आहे.

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या