राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल; मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी आणि तपास यंत्रणांना नवी दिशा देण्यासाठी गृह विभागाने शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचा मोठा धडाका उडवला. अपर पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात समावेश असून मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई या प्रमुख शहरांसह कोकण, कोल्हापूर आणि नाशिक परिक्षेत्राला नवे कारभारी मिळाले आहेत. अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या गुन्हे शाखा, कायदा-सुव्यवस्था, आर्थिक गुन्हे, दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नियोजन-समन्वय विभागांमध्येही या निमित्ताने मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, अपर पोलीस महासंचालक (फोर्स वन) कृष्ण प्रकाश यांची अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) पदावर बदली करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्याकडे राज्य मानवी हक्क आयोगाची जबाबदारी सोपविण्यात आली असून प्रशिक्षण विभागातील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई पोलीस दलातही महत्त्वाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोज शर्मा यांची मुंबईच्या पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) सुवेझ हक यांची पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त महेश पाटील यांना पदोन्नती देत विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


दहशतवादविरोधी पथकात महत्त्वाचे फेरबदल


दहशतवादविरोधी पथकातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. अपर पोलीस आयुक्त परमजीत दहिया यांची पदोन्नती करून विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी. के. मीना यांची बदली कोकण परिक्षेत्रात करण्यात आली आहे.

कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना पुण्याचे पोलीस सह आयुक्त करण्यात आले आहे. पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजन शर्मा यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र म्हणून नियुक्ती झाली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे आता गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) ची जबाबदारी देण्यात आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेची धुरा निशीथ मिश्रा यांच्याकडे


आर्थिक गुन्हे शाखेतही फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस सह आयुक्त (आर्थिक गुन्हे) निशीथ मिश्रा यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) पदावर बदली झाली असून, पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले राजेश प्रधान यांची पोलीस सह आयुक्त (आर्थिक गुन्हे), मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे एस. बी. पाठक यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे), गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.

ठाणे आणि नवी मुंबईत स्थिती काय?


- ठाणे आणि नवी मुंबईतही बदल्यांची मालिका पाहायला मिळाली. अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांना ‘इन सिटू प्रमोशन’ देण्यात आले असून तेच ठाणे येथे कार्यरत राहणार आहेत. अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांची नवी मुंबईहून पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई येथे पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे पंजाबराव उगले यांना विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस गृहनिर्माण महामंडळ येथे पाठविण्यात आले आहे.
याशिवाय, विनायक देशमुख यांची नियंत्रक, वेधमापन पदावर नियुक्ती करण्यात आली असून ज्योती प्रिया सिंह यांना पदोन्नती देत विशेष पोलीस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईतील पोलीस सह आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांची पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई येथे बदली झाली असून, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण चौधरी यांच्याकडे वाहतूक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Comments
Add Comment

New Jail In Mumbai : मुंबईत मानखुर्द परिसरात ११ एकर भूखंडावर उभारणार नवे कारागृह

मुंबई : राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द

महाराष्ट्र सरकारकडून विमान इंधनावरील 'व्हॅट'मध्ये ११ टक्क्यांची कपात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय; 'एटीएफ'वरील व्हॅट १८ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांवर मुंबई : पश्चिम

Ravi Shastri : 'हाच होणार भारताच्या T20 संघाचा कर्णधार'

मुंबई : भारताच्या टी २० संघाचा कर्णधार कोण होणार यावरून क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवचा

Minister Chhagan Bhujbal : दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर मुंबई : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने

State Government : व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारकडून नवे धोरण जाहीर

 कमी पटसंख्येच्या शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले मुंबई : राज्यातील शाळांच्या

Uddhav Thackeray Eknath Shinde : "आम्ही इथे रिकामे बसलो नाही, नेत्यांना आवरा!" 'त्या' एका विनंतीने खंडपीठाची ठाकरे गटाला चपराक

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या अत्यंत