महाराष्ट्र सरकारकडून विमान इंधनावरील 'व्हॅट'मध्ये ११ टक्क्यांची कपात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय; 'एटीएफ'वरील व्हॅट १८ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांवर


मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्र अडचणीत आले असतानाच, महाराष्ट्र सरकारने राज्यातील विमान प्रवाशांना आणि विमान कंपन्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. विमानाच्या इंधनावरील (एटीएफ) मूल्यवर्धित कर (व्हॅट) १८ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून शुक्रवार, दि. १५ मेपासूनच याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जागतिक संकटामुळे विमान भाड्यात होणारी संभाव्य वाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.


पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हवाई हद्दीवरील निर्बंध, विमानांच्या उड्डाणांमधील अनिश्चितता आणि विमानांच्या इंधनाचे (एटीएफ) गगनाला भिडणारे दर यामुळे विमान कंपन्या आर्थिक दबावाखाली आहेत. या कठीण काळात केंद्र सरकारने देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी इंधनाचे दर मर्यादित करणे, विमानतळ शुल्कात कपात करणे आणि आणीबाणीच्या काळात पतपुरवठा वाढवणे अशा अनेक सवलती दिल्या आहेत. मात्र, राज्यांकडून आकारला जाणारा 'व्हॅट' हा विमान कंपन्यांसाठी मोठा खर्च ठरत होता.



केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने संकट काळात इंधनावरील 'व्हॅट' कमी करण्यासाठी सर्व राज्यांशी चर्चा सुरू केली होती. या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत. महाराष्ट्राने अत्यंत योग्य वेळी घेतलेल्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर भाडेवाढ होत असतानाही राज्यातील विमान भाडे नियंत्रणात ठेवणे शक्य होणार आहे.



राज्यातील २ लाख प्रवाशांना थेट फायदा


देशात सर्वाधिक विमान वाहतूक महाराष्ट्रातून होते. सध्या राज्यात १६ विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, वर्षाला सुमारे ७.५ कोटी तर रोज सरासरी २ लाख प्रवासी राज्यातून विमानाने प्रवास करतात. इंधनावरील कर थेट ११ टक्क्यांनी कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व १६ विमानतळांवरून होणाऱ्या विमान उड्डाणांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. यामुळे विमान कंपन्यांचा परिचालन खर्च कमी होणार असून, त्याचा थेट फायदा सर्वसामान्य विमान प्रवाशांना तिकीट दरात कपात किंवा स्थिरता याद्वारे मिळेल.

Comments
Add Comment

राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल; मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी आणि तपास यंत्रणांना नवी दिशा देण्यासाठी गृह विभागाने

Ravi Shastri : 'हाच होणार भारताच्या T20 संघाचा कर्णधार'

मुंबई : भारताच्या टी २० संघाचा कर्णधार कोण होणार यावरून क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवचा

Minister Chhagan Bhujbal : दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर मुंबई : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने

State Government : व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारकडून नवे धोरण जाहीर

 कमी पटसंख्येच्या शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले मुंबई : राज्यातील शाळांच्या

Uddhav Thackeray Eknath Shinde : "आम्ही इथे रिकामे बसलो नाही, नेत्यांना आवरा!" 'त्या' एका विनंतीने खंडपीठाची ठाकरे गटाला चपराक

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या अत्यंत

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

कर्जमाफी, शेतकरी मदत आणि ‘लखपती दीदी’ अभियानालाही वेग देणार सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या