HSRP : १ जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) बसविणे अनिवार्य..

वाहनधारकांनी वेळेत अपॉइंटमेंट घेऊन HSRP बसवून घ्यावी;


नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड


मुंबई : राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.



परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात जुन्या वाहनांनाही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत वेळेत HSRP बसवून घ्यावी.”


वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSRP बसविण्यासाठी आगाऊ वेळ (Appointment) निश्चित करावी. संबंधित वाहनधारकांनी ३० जून २०२६ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



सरनाईक पुढे म्हणाले की, “ज्या वाहनधारकांनी मुदतीत HSRP बसवून घेतले नाही किंवा अपॉइंटमेंट नोंदवली नाही, अशा वाहनांची १ जुलै २०२६ पासून रस्त्यावर विशेष तपासणी मोहीम राबवून पडताळणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल तसेच १ हजार रुपयांपर्यंत तडजोड शुल्क (Compounding Fees) आकारण्यात येईल.”


वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले आहे.


राज्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया गांभीर्याने घेत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Comments
Add Comment

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)

Vishawas Nangare Patil : नागपूरच्या पोलीस दलात मोठे बदल; विश्वास नांगरे पाटील नवे CP

नागपूर : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी

Kolhapur Shaken : माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्या; परिसरात शोककळा

कोल्हापूर: कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक परिसरात एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा