Sangli : सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू

सांगली : जत तालुक्यात मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिराची भिंत कोसळून सोमवारी दोन मुलांसह सहाजणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत आठ जण जखमी झाले आहेत. वादळी वाऱ्यामुळे बचावासाठी ज्या मंदिराच्या भिंतीचा आसरा घेतला तीच भिंत जीवघेणी ठरली. मृतांमध्ये अरुण विष्णू गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, विजयपूर, कर्नाटक), सोन्या लक्ष्मण गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, विजयपूर) आणि कोंडीबा राऊबा गेजगे (वय ६५, रा. दारिबडची) यांचा समावेश आहे. उर्वरित तिघांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.



जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा भरली होती. सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी वारे सुटले. त्यापासून बचावासाठी परिसरातील काही नागरिकांनी मरगुबाई मंदिराकडे धाव घेतली. मंदिराच्या एका भिंतीजवळ आसरा घेतला. त्याच दरम्यान वादळी वाऱ्याच्या तडाख्याने मंदिराची भिंत अचानक कोसळली. या भिंतीखाली सापडून अरुण विष्णू गेजगे, सोन्या लक्ष्मण गेजगे आणि कोंडीबा राऊबा गेजगे यांच्यासह सहाजणां मृत्यू झाला. या दुर्घटनेत आठजण जखमी झाले आहेत. दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर परिसरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा सुरू केला आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे मोटेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

KERALA : मान्सून केरळच्या उंबरठ्यावर

पुढील २४ ते ४८ तासांत धडकणार, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट' पुणे : कडाक्याच्या उन्हाने हैराण

Cabinet Decision: शेतकरी कर्जमाफीचे निकष जाहीर

दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ; ‘वन टाईम सेटलमेंट’ आणि प्रोत्साहनपर अनुदान देणार मुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांना

Cabinet decision : ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधांना बूस्टर

 'मुख्यमंत्री ग्राम सडक योजने'साठी ६ हजार ४२९ कोटी; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : राज्यातील ग्रामीण संपर्क

Minister Adv. Ashish Shelar : रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार

मुंबई,  : रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास

Monsoon 2026 : दिलासादायक! येत्या ४८ तासांत केरळमध्ये पाऊस बरसणार; महाराष्ट्रासह 'या' राज्यांना पाऊस झोडपणार! IMD चा अंदाज काय ?

मुंबई : उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली

अमृता फडणवीसांनी चालवली गुलाबी ई-रिक्षा; महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात

मुंबई  : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक