Sangli : सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू

सांगली : जत तालुक्यात मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिराची भिंत कोसळून सोमवारी दोन मुलांसह सहाजणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत आठ जण जखमी झाले आहेत. वादळी वाऱ्यामुळे बचावासाठी ज्या मंदिराच्या भिंतीचा आसरा घेतला तीच भिंत जीवघेणी ठरली. मृतांमध्ये अरुण विष्णू गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, विजयपूर, कर्नाटक), सोन्या लक्ष्मण गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, विजयपूर) आणि कोंडीबा राऊबा गेजगे (वय ६५, रा. दारिबडची) यांचा समावेश आहे. उर्वरित तिघांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.



जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा भरली होती. सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी वारे सुटले. त्यापासून बचावासाठी परिसरातील काही नागरिकांनी मरगुबाई मंदिराकडे धाव घेतली. मंदिराच्या एका भिंतीजवळ आसरा घेतला. त्याच दरम्यान वादळी वाऱ्याच्या तडाख्याने मंदिराची भिंत अचानक कोसळली. या भिंतीखाली सापडून अरुण विष्णू गेजगे, सोन्या लक्ष्मण गेजगे आणि कोंडीबा राऊबा गेजगे यांच्यासह सहाजणां मृत्यू झाला. या दुर्घटनेत आठजण जखमी झाले आहेत. दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर परिसरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा सुरू केला आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे मोटेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Train Viral Video : चक्क चालत्या ट्रेनमध्ये पूजा अर्चा! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) सध्या भारतीय रेल्वेच्या (indian Railway) एका चालत्या डब्यात धार्मिक विधी आणि पूजा केली जात

Jejuri Palkhi Accident : जेजुरी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन

Sunetra Pawar : सासवड-जेजुरी मार्गावरील अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रुग्णालयात; जखमी वारकऱ्यांना दिला धीर, तातडीच्या उपचाराचे आदेश

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने वारकरी

Asmita Katkar death case : मुलगा होईल म्हणून कपडे घेतले आणि...; अस्मिता काटकर मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण! आई-वडिलांचे सासरच्यांवर गंभीर आरोप

कोल्हापूर : कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात एका महिन्याच्या चिमुकलीच्या आईने आत्महत्या केल्याच्या घटनेने

Ashadhi Wari Accident : जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात अपघात; टेम्पोच्या धडकेत ३ वारकरी महिलांचा मृत्यू, ४ वारकरी जखमी

जेजुरी : आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळा सुरू असतानाच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी (Palkhi) मार्गावर मोठी दुर्घटना (Accident)

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची उघडीप कायम; 'या' तारखेनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून २१ जुलैनंतर पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता; जुलैअखेर चांगल्या पावसाचा अंदाज राज्यात पुन्हा एकदा