Monsoon Update : आनंदाची बातमी, अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; कोकणात ६ जूनला आगमनाचा अंदाज

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदमानचा समुद्र आणि निकोबार बेटांच्या काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले आहे.



हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता असून, ३१ मे पर्यंत तो केरळमध्ये पोहोचेल. त्यानंतर मान्सूनचा प्रवास पुढे सरकत ५ जून रोजी गोव्यात, ६ जून रोजी कोकणात आणि ७ जूनपर्यंत पुण्यापर्यंत पावसाचे आगमन होण्याचा अंदाज आहे.



हवामान विभागाने एक महत्त्वाची बाब नमूद केली आहे ती म्हणजे, यंदा मान्सूनच्या प्रवासादरम्यान बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ तयार झालेले नाही. चक्रीवादळाचा अडथळा नसल्यामुळे मान्सून कोणत्याही व्यत्ययाविना वेळेत प्रगती करू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



राज्यात तूर्त उन्हाचा तडाखा कायम : मान्सूनची बातमी सुखावणारी असली तरी, पुढील काही दिवस महाराष्ट्रात उन्हाचा कडाका कायम राहणार आहे. १५ मे पर्यंत राज्यातील विविध भागांत तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल. राज्यातील काही भागांत १८ मे पर्यंत तापमान चढेच राहणार असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.


सांख्यिकीय पद्धत : २००५ पासून हवामान विभाग केरळमधील मान्सूनच्या आगमनासाठी प्रगत सांख्यिकीय पद्धतीचा वापर करत आहे. जरी विभाग इतर राज्यांसाठी अधिकृत तारखा जाहीर करत नसला, तरी उपलब्ध डेटाच्या आधारे मान्सूनच्या प्रगतीचा अंदाज वर्तवला जातो, जो शेतकऱ्यांसाठी आणि नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन