Maharashtra Assembly’s Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या १७ जागा भरणार?

निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग; स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची अट पूर्ण झाल्याने मार्ग मोकळा


मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी या निवडणुका पार पडल्यास वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.



राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे अनेक मतदारसंघांतील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपूनही निवडणुका घेता आल्या नव्हत्या. नियमानुसार, संबंधित मतदारसंघात किमान ७५ टक्के मतदार (नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य इ.) उपलब्ध असणे आवश्यक असते. आता निवडणुका पार पडल्याने ही कायदेशीर अट पूर्ण झाली असून, निवडणूक आयोगाकडून लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाण्याची चिन्हे आहेत.


या जिल्ह्यांत होणार रणसंग्राम

  • पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर

  • अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, पुणे

  • सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया

  • रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली

  • परभणी-हिंगोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड आणि छत्रपती संभाजीनगर-जालना.




राजकीय गणिते बदलणार!

विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्यांपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून येतात. सध्या त्यातील १७ जागा रिक्त आहेत. या १७ जागांच्या निकालाचा थेट परिणाम विधान परिषदेतील पक्षीय बलाबलावर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पक्षाचे वर्चस्व राहिले आहे, त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी नवे सदस्य निवडून आल्यास सभागृहात आपली ताकद वाढवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, अनेक दिग्गज नेते आणि इच्छुकांनी आतापासूनच पक्षश्रेष्ठीं घरच्या वाऱ्या सुरू केल्या असून, काही मतदारसंघांत उमेदवारीवरून अंतर्गत चुरस निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Healthy Monsoon Diet : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत?

पावसाळा (Monsoon) सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं

Nashik : FDA अधिकाऱ्यांच्या नावाखाली खंडणी ! शहरात FDA च्या धाडी सुरू असताना तोतया अधिकाऱ्यांचा प्रताप

Nashik : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून राज्यभर भेसळविरोधी धाडींचे सत्र सुरू असताना, याच परिस्थितीचा गैरफायदा घेत

Riteish Deshmukh : पत्रकाराच्या एका प्रश्नाने रंगला वाद; रितेश देशमुखचा व्हिडिओ व्हायरल

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याच्या नव्या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आला आहे. नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप: सच या

Nashik : वणी येथे मंडप काढताना विजेचा धक्का लागून मंडप व्यावसायिकाचा मृत्यू

दिंडोरी : वणी येथे लग्नाचा मंडप काढण्यासाठी गेलेल्या मंडप व्यावसायिकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

Nashik : नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणाची 'तारीख पे तारीख'; मंत्री भुजबळांच्या शिफारस पत्राला महावितरणकडून केराची टोपली

Nashik : लोकप्रतिनिधींच्या पत्रालाही किंमत नाही आणि सामान्य जनतेच्या हक्काचीही दखल घेतली जात नाही, असा संतापजनक

Badlapur Accident : भरधाव BMW रस्त्यावर पलटली; भीषण अपघातात दोन जण ठार

बदलापूर : बदलापूर (Badlapur) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून