Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात मांसाहार, लसूण आणि कांद्यासारखे पदार्थ खाणे वर्ज्य मानले जाते. सर्वसाधारणपणे यामागे केवळ धार्मिक कारण सांगितले जात असले, तरी वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित दृष्टिकोनही दडलेला आहे.


 

मान्सून आणि पचनशक्तीवर होणारा परिणाम :


श्रावण महिना पावसाळ्यात येतो. या काळात हवेत जास्त दमटपणा असतो, ज्यामुळे सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया आणि फंगस वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. या ऋतूत माणसांची पचनशक्ती कमकुवत झालेली असते. आशा काळात पचायला जड आणि मांसाहारी भोजन केल्यास गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या शारीरिक समस्या उद्भवतात. त्यामुळे या काळात हलका आहार घेणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.



श्रावणात मांसाहार केल्याने काय होते?


या काळात मटण, चिकन किंवा मासे योग्य तापमानात ठेवले नाहीत किंवा योग्य पद्धतीने शिजवले गेले नाहीत, तर ते लवकर खराब होतात. असे अन्न खाल्ल्याने पोटात इन्फेक्शन, फूड पॉयझनिंग आणि डायरियासारख्या आजारांची जोखीम अनेक पटीने वाढते.


प्राचीन काळात फ्रिज किंवा आधुनिक शीतकरणाची सुविधा नसल्यामुळे या आजारांपासून बचाव करण्यासाठी मांसाहार बंद केला जात होता. मान्सूनदरम्यान पचनक्षमता कमकुवत होत असल्याने आरोग्य तज्ज्ञदेखील ताजा, हलका आणि सहज पचणारा आहार घेण्याचा सल्ला देतात.



आयुर्वेदानुसार योग्य आहार :


या काळात हिरव्या भाज्या आणि साधा आहार घेतल्याने शरीराला आवश्यक पोषण तर मिळतेच, शिवाय पचनतंत्रावर कोणताही अतिरिक्त ताण येत नाही. आयुर्वेदात या गोष्टीचा विशेष उल्लेख आढळतो की, पावसाळ्यात असा आहार घ्यावा जो शरीराला पुरेशी ऊर्जा देईल, पण पोटाला जडपणा आणणार नाही.


प्रजनन काळ :


श्रावण महिना विशेषतः पाण्यात राहणाऱ्या सजीवांसाठी प्रजननाचा काळ असतो. जर तुम्ही यावेळी मांसाहारी पदार्थ खाल्ले तर ते जलचर सजीवांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा आणेल. म्हणून मांसाहारी पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.

Comments
Add Comment

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे

कॉर्टिसोल म्हणजे काय? 'तणावाच्या संप्रेरका' बाबतच्या सोशल मीडियावरील दाव्यांमध्ये किती तथ्य? डॉक्टरांचा सल्ला

सध्या इंटरनेटवर 'कॉर्टिसोल' (Cortisol) या हार्मोनची मोठी चर्चा आहे. वेलनेस इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियावर पहाटे ३ वाजता