Mumbai : मुंबईत नदी आणि खाडीच्या पातमुखांना अतिक्रमणांचा विळखा, नाल्यांच्या परिसरात राडारोडा

मुंबई : मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने नाले आणि मिठी नदीच्या सफाई कामाला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात नाल्यांच्या भोवती संरक्षक भिंत उभारुनही त्यामध्ये कचरा फेकला जातो, तसेच नाल्यांच्या परिसरात वन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील अनेक जागांवर आधीच राडारोडा टाकला जातो. त्यामुळे हाच राडारोडा नाल्यात टाकून गाळाचे वजन वाढवण्याचा प्रयत्न कंत्राटदारांकडून केला जात असल्याची बाब भाजप नेत्यांच्या पाहणीमध्ये दिसून आली आहे. त्यामुळे नाल्यांच्या आणि नदींच्या पातमुखाजवळ भराव टाकून बांधलेल्या झोपड्यांवर त्वरीत कारवाई करून खाडीच्या पातमुखाकडे जाणाऱ्या नाल्यांचे रुंदीकरण करण्याचे निर्देश स्थायी समितीने प्रशासनाने दिले.





मुंबई महापालिकेचे सभागृहनेते गणेश खणकर यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे पूर्व उपनगरातील उषा नगर नाल्याची पाहणी केली असता ठिकाणी सुरक्षा भिंत उंचीची बनवूनही त्यात कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले.तसेच आसपासच्या जागांवर आधीपासून डेब्रीज टाकल्याचे दिसून आले. तर अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी व वन विभागाच्या अखत्यरित हा भराव टाकला जात असून नाले बुजवून झोपड्या उभारल्या जात आहे. त्यामुळे पातमुखे अरुंद झाली असून आपण मुंबईत कितीही स्वच्छता केली तरी मुंबईतील या पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होणार नाही. त्यामुळे मागील दहा वर्षांती सॅटेलाईन मॅप पाहून अशाप्रकारच्या नाल्याची रुंदी कमी करणाऱ्या अतिक्रमणांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी खणकर यांनी हरकतीच्या मुदयाद्वारे केली. याला उबाठाचे यशोधर फणसे यांनी पाठिंबा देताना काही दिवसांपूर्वी मोगरा नाल्याची पाहणी सहपालकमंत्र्यांसह भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह सभागृहनेत्यांनी केली होती. परंतु दुसऱ्या दिवसापासून तिथे गाड्या आहेत, पण चालकच दिसून येत नसल्याचे सांगितले.



तर राखी जाधव यांनी कामराज नगर नाला आणि रमाबाई नगर नाल्याचा काही भाग खाडीचा असून त्याठिकाणी भराव टाकला जातो. यावर प्रशासनाचा अंकूश नसून येथील पोलिस चौकी हीच आता ऑक्ट्रॉय चौकी बनली आहे,असा आरोप केला. मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी मिठी नदीसह धारावीतील नाल्यांची अद्यापही सफाई न झाल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी कल्व्हर्टचे काम झाले असले तरी पातमुखांचे काम कसे करणार असा सवाल करत मिठी नदीच्य सफाईत प्रशासन आपल्याला धोका देत असल्याचा आरोप केला.


भाजपच्या प्रिती सातम यांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने नालेसफाई कशी होणार याचे सादरीकरण दिले होते, पण तशी सफाई काही होत नसून वालभट नाल्यामध्ये टाकलेला भराव कुणाचा याचा शोध घेण्याचा काम सुरु आहे, मग यातील गाळ कधी काढणार? तसेच धाकड नाल्यावरील अतिक्रमणे हटवून हा नाला रुंद कधी करणार असाही सवाल उपस्थित केला. उबाठाच्या मिनाक्षी पाटणकर यांनी आपल्या विभागात अद्यापही एकाही नाल्याच्या सफाई कामाला सुरुवात न झाल्याचे सांगितले. एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी आपल्या प्रभागातील नाल्यात दगट विटांचा भराव टाकल्यानंतर मी स्वत: पकडून दिले असल्याचे सांगितले. तर श्रध्दा जाधव यांनी नालेनिहाय सफाईची माहिती देण्याची मागणी केली. हरिष भांदीर्गे आणि अश्रफ आझमी यांनी मिठी नदीच्या सफाई कामाला योग्यप्रकारे सुरुवात न झाल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. प्रकाश दरेकर यांनी आता एवढ्या कमी दिवसांमध्ये सफाई कशी करणार? जादुची कांडी फिरवणार का असा सवाल केला. तर राजेश्री शिरवडकर यांनी आपल्या विभागात एकही नाला नसला तरी आजुबाजुच्या प्रभागातील नाल्यांमुळे माझ्या प्रभागात पाणी साचले जाते. त्यामुळे दादर धारावी नाल्यांतर्गत पंपिंग स्टेशनचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार असा सवाल केला.


पातमुखे करा अतिक्रमण मुक्त - प्रभाकर शिंदे


मुंबईची तुंबई जर पातमुखे अरुंद झाल्यामुळे आणि तिथे अतिक्रमणे झाल्यामुळे होत असेल तर या झोपड्यांवर कारवाई करा आणि ही पातमुख्ये अतिक्रमण मुक्त असे निर्देश दिले. अशाप्रकारे महापालिकेला कारवाई करावीच लागेल. घाटकोपरमध्ये जिल्हाधिकारी यांच्या जागेवर भराव टाकून झोपड्या बांधल्या जात असल्यामुळे आपण स्वत: जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच परिमंडळ पाच मध्ये सफाई काम योग्य प्रकारे होत नसून याठिकाण महापालिकेच्यावतीने ही सफाई आपल्याच कामगारांमार्फत केली जावी असेही निर्देश दिले. केवळ सादरीकरणा नको तर प्रत्यक्षात घटनास्थळी काय सफाई होते याकडे अधिकाऱ्यांनी पहावे. त्यामुळे यापुढे तुम्ही सांगाल तिथे नाही तर नगरसेवक सांगेल तिथेच पाहणी केली जाईल,असे सांगत खणकर यांनी उपस्थित केलेला हरकतीचा मुद्दा प्रभाकर शिंदे यांनी राखून ठेवला.

Comments
Add Comment

Contaminated water : गोरेगाव गोकुळधाम परिसरात दुषित पाण्याचा पुरवठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये पाण्याची तीव्र समस्या असली तरी प्रत्यक्षात गोरेगाव

BMC : महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाला जुन्याच व्हिडीओ वॉलचा आधार

मुंबई : मुंबईतील विविध ठिकाणांवरील महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षातील व्हिडीओ वॉलच्या माध्यमातून लक्ष

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीने बंद पाडलेली पोलीस गृहनिर्माण योजना पुन्हा सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय; ५,४५९ पोलिसांच्या घरांसाठी १,७६८ कोटींचा निधी मंजूर मुंबई : राज्यातील

Anna Bansode : चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढा..

एका महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश... मुंबई: मुंबईतील

Young woman commits suicide : मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; मृत्यूनंतर बापानं वाजवल्या टाळ्या

मुंबई : नवी मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या २४ वर्षीय स्वप्नाली घेवारी

BMC News : कुरकुरीत पदार्थांच्या वेष्ठनांवरील बंदीत महापालिकेने हात झटकले

राज्य शासन आणि महाराष्ट्र प्रदुषण मंडळांकडे पाठपुराव्याबाबत मौन मुंबई (विशेष प्रतिनिधी) पॅकेजिंग मटेरियल (Packaging)