सोमनाथ महोत्सवात काय म्हणाले PM Modi ?

सोमनाथ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोमनाथ मंदिरात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात सहभाग घेतला. सोमनाथ मंदिर पुनरुज्जीवनाच्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित या सोहळ्यात त्यांनी भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचा गौरव केला. यावेळी त्यांनी १९९८ च्या पोखरण अणुचाचणीचा संदर्भ देत भारताच्या सामर्थ्याचे आणि स्वाभिमानाचे जोरदार समर्थन केले.





पंतप्रधानांनी सांगितले की, ११ मे हा दिवस केवळ सोमनाथच्या प्राणप्रतिष्ठेचाच नाही, तर भारताच्या अणुचाचणीचाही ऐतिहासिक साक्षीदार आहे. "१९९८ मध्ये जगातील मोठ्या शक्तींनी भारतावर निर्बंध लावून आपल्याला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. दबाव इतका होता की इतर कोणताही देश झुकला असता, पण अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताने नमण्यास नकार दिला. ११ मे नंतर १३ मे रोजी पुन्हा दोन चाचण्या करून भारताने आपली अढळ राजकीय इच्छाशक्ती जगाला दाखवून दिली," असे मोदी म्हणाले. "१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण १९५१ मध्ये सोमनाथच्या प्राणप्रतिष्ठेने भारताच्या मुक्त जाणीवेची घोषणा केली," असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या मते, सोमनाथ मंदिर हे केवळ इतिहासाचे प्रतीक नसून पुढील हजार वर्षांसाठी प्रेरणेचा उत्सव आहे.





तुष्टीकरणाच्या राजकारणावर प्रहार : पंतप्रधानांनी नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मंदिर उभारणीसाठी मोठे प्रयत्न केले, पण तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्याला विरोध केला होता. "अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीला ज्या मानसिकतेने विरोध केला, तीच 'तुष्टीकरणाचे राजकारण' करणारी शक्ती आजही सक्रिय आहे. आपल्याला अशा संकुचित राजकारणापासून सावध राहावे लागेल," असा इशारा त्यांनी दिला.



वारसा आणि आधुनिकतेचा संगम : पंतप्रधानांच्या मते, भारतासाठी वारसा आणि आधुनिकता हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. "सांस्कृतिक केंद्रांच्या दुर्लक्षामुळेच भारताच्या प्रगतीत अडथळे आले होते, जे आता दूर केले जात आहेत," असे त्यांनी नमूद केले. या निमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात आले.



सोहळ्यातील विशेष क्षण : महापूजा: कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिरात 'महापूजा' केली. भगवान शिवाच्या या ज्योतिर्लिंगाच्या भव्य कळसाला ११ पवित्र तीर्थक्षेत्रांतील पाण्याने अभिषेक करण्यात आला.


रोड शो : हेलिपॅडपासून वीर हमीरजी सर्कलपर्यंत सुमारे १.५ किमीचा भव्य रोड शो काढण्यात आला. हजारो नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पंतप्रधानांचे जल्लोषात स्वागत केले.

Comments
Add Comment

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात

UGC : अमली पदार्थविरोधी अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)

Cough Syrup Warning For Kids : लहान मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी

नवी दिल्ली : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी-खोकल्यावरील