West Bengal : पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयाने 'शांतीदूतांना' धक्का ?

कोलकाता : पश्चिम बंगालमार्गे भारतामध्ये बिनबोभाट घुसखोरी अनेक वर्षे सुरू होती. पण भाजपच्या नेतृत्वात सरकार येताच पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्याच्या शेजारी देशाशी जोडलेल्या सीमेवर मजबूत कुंपण घालायचे. घुसखोरील आळा घालायचा. हावडा येथील 'नबन्ना' (सचिवालय) येथे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पश्चिम बंगाल सरकारने हा निर्णय घेतला. पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयांमुळे 'शांतीदूतांना' तसेच घुसखोरीच्या योजना आखणाऱ्यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे.



राज्याच्या सुरक्षेसह प्रशासकीय आणि सामाजिक हिताचे एकूण सहा महत्त्वपूर्ण निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतले. अवैध घुसखोरीला आळा घालण्यासाठी भारत-बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्याकरिता सीमा सुरक्षा दलाला जमीन हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ही प्रक्रिया आजपासूनच सुरू झाली असून, पुढील ४५ दिवसांत ही जमीन केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सुपूर्द केली जाईल, असे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.



मागील सरकारने जाणीवपूर्वक रोखून धरलेला नवीन फौजदारी कायदा 'भारतीय न्याय संहिता' आता राज्यात तातडीने लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या आयपीसी आणि सीआरपीसीच्या जागी आता संपूर्ण बंगालमध्ये बीएनएस कार्यान्वित होईल. केंद्र सरकारची 'आयुष्मान भारत' आणि 'जन आरोग्य' योजना आता पश्चिम बंगालमध्ये लागू केली जाईल. तसेच उज्ज्वला योजनेशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने केंद्राकडे पाठवण्यात आली आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार, राज्य सरकारच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवामधील अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षणासाठी पाठवण्यास मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : पुढील एक वर्ष सोने खरेदीला 'ब्रेक' द्या...पंतप्रधान मोदींच्या आवाहनामागील नेमके गणित काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी १० मे २०२६ रोजी हैदराबाद (Hydrabaad) येथे एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना एक

Rajnath Singh : जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार अ‍ॅलर्ट मोडवर; राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दीड तास बैठक

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील (पश्चिम आशिया) वाढत्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत असताना, भारत सरकारने

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा: राहुल गांधींवर बोचरी टीका; म्हणाले त्यांची समजच...

नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे सध्या दिल्लीच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर असून,

Bharath Kanth : ३१ वर्षीय उदयोन्मुख तेलगू अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू; हैदराबाद मधील आउटर रिंग रोडवर ट्रकला कारची धडक

हैदराबाद : तेलुगू चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख अभिनेता भरत कांत (Bharath Kanth) याचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

Chandranath Rath Death : मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीयाच्या हत्येचा उलगडा; ३ आरोपी जेरबंद, एका 'UPI' पेमेंटमुळे लागला छडा!

कोलकाता : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी (Suvendhu Adhikari) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी चंद्रनाथ रथ (Chandranath Rath)

National Technology Day : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त (National Technology Day) देशवासियांना