National Technology Day : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त (National Technology Day) देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी देशातील शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाची आणि त्यांच्या समर्पणाची आठवण करून दिली. देशाचे शास्त्रज्ञ हे भारताच्या गौरव आणि स्वाभिमानाचे खरे शिल्पकार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.


पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले की, “आपण आपल्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाची अभिमानाने आठवण करतो. त्यांच्या अथक मेहनतीमुळेच १९९८ मध्ये पोखरण येथे यशस्वी अणुचाचण्या शक्य झाल्या. तो ऐतिहासिक क्षण भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा आणि दृढ संकल्पाचा प्रतीक होता.” ते पुढे म्हणाले की, ‘आत्मनिर्भर भारत’ उभारण्यात तंत्रज्ञान हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. तंत्रज्ञानामुळे नवकल्पनांना गती मिळत असून विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. नव्या प्रतिभांना सक्षम करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले, जेणेकरून देशाची प्रगती आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता येतील.



एका अन्य पोस्टमध्ये पंतप्रधानांनी (Narendra Modi) लिहिले की, “१९९८ मधील पोखरण अणुचाचण्यांनी भारताच्या अद्भुत शक्तीची जगाला ओळख करून दिली.” यावेळी त्यांनी आपल्या ‘सुभाषितम्’ मालिकेतील एक संस्कृत श्लोकही शेअर केला; “अग्निर्मूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम्। अपां रेतांसि जिन्वति॥” या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी म्हटले की, “अग्नी ही द्युलोकातील सर्वोच्च शक्ती असून पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा मूलस्रोत आहे. हेच अग्नितत्त्व पदार्थाच्या सूक्ष्म कणांमध्ये दडलेल्या अपरिमित शक्तीला जागृत करते आणि संपूर्ण सृष्टीत ऊर्जा व गती निर्माण करते.”





उल्लेखनीय म्हणजे, ११ मे १९९८ रोजी भारताने ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत यशस्वी अणुचाचण्या केल्या होत्या. याच दिवशी स्वदेशी ‘हंसा-३’ विमानाने पहिले उड्डाणही केले होते. या ऐतिहासिक कामगिरींच्या सन्मानार्थ तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

Comments
Add Comment

Bangladeshi Nationals Detained In Ahmedabad : गुजरातमध्ये अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; अहमदाबादमधून १३१ बांगलादेशी नागरिक ताब्यात, १६० हून अधिक संशयितांची चौकशी सुरू

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी मोठी

India-Nepal Border Issue : भारत – नेपाळ सीमा प्रश्नावर भारताने नाकारला तृतीय पक्षाचा सहभाग

- युरोपीयन युनियन व पाकिस्तान संयुक्त निवेदन भारताने फेटाळले नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA)

Khan Sir Coaching Classes Fire : खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; 'माझ्या यशामुळेच काही जणांना त्रास', प्रतिस्पर्धी संस्थांवर खान सरांचे गंभीर आरोप

पाटणा : बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे खान सर यांच्या कोचिंग

Surat ST Bus Accident : गुजरातमध्ये भीषण एसटी अपघातात ७ जणांचा होरपळून मृत्यू तर ४१ प्रवासी जखमी; जाणून घ्या नेमका कसा घडला अपघात

सुरत : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसमध्ये झालेल्या भीषण

Surat Bus Accident : सुरतमध्ये महाराष्ट्राच्या दोन 'एसटी' बसचा अपघात

सुरत : गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या

Bomb Threat : अहमदाबादमध्ये खळबळ! स्पोर्ट्स क्लब उडवण्याची धमकी; पत्रात दाऊद आणि लष्कर-ए-तोयबाचा उल्लेख

अहमदाबाद: गुजरातची राजधानी अहमदाबादमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. अहमदाबादच्या प्रसिद्ध स्पोर्टस क्लबला