National Technology Day : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त (National Technology Day) देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी देशातील शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाची आणि त्यांच्या समर्पणाची आठवण करून दिली. देशाचे शास्त्रज्ञ हे भारताच्या गौरव आणि स्वाभिमानाचे खरे शिल्पकार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.


पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले की, “आपण आपल्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाची अभिमानाने आठवण करतो. त्यांच्या अथक मेहनतीमुळेच १९९८ मध्ये पोखरण येथे यशस्वी अणुचाचण्या शक्य झाल्या. तो ऐतिहासिक क्षण भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा आणि दृढ संकल्पाचा प्रतीक होता.” ते पुढे म्हणाले की, ‘आत्मनिर्भर भारत’ उभारण्यात तंत्रज्ञान हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. तंत्रज्ञानामुळे नवकल्पनांना गती मिळत असून विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. नव्या प्रतिभांना सक्षम करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले, जेणेकरून देशाची प्रगती आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता येतील.



एका अन्य पोस्टमध्ये पंतप्रधानांनी (Narendra Modi) लिहिले की, “१९९८ मधील पोखरण अणुचाचण्यांनी भारताच्या अद्भुत शक्तीची जगाला ओळख करून दिली.” यावेळी त्यांनी आपल्या ‘सुभाषितम्’ मालिकेतील एक संस्कृत श्लोकही शेअर केला; “अग्निर्मूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम्। अपां रेतांसि जिन्वति॥” या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी म्हटले की, “अग्नी ही द्युलोकातील सर्वोच्च शक्ती असून पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा मूलस्रोत आहे. हेच अग्नितत्त्व पदार्थाच्या सूक्ष्म कणांमध्ये दडलेल्या अपरिमित शक्तीला जागृत करते आणि संपूर्ण सृष्टीत ऊर्जा व गती निर्माण करते.”





उल्लेखनीय म्हणजे, ११ मे १९९८ रोजी भारताने ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत यशस्वी अणुचाचण्या केल्या होत्या. याच दिवशी स्वदेशी ‘हंसा-३’ विमानाने पहिले उड्डाणही केले होते. या ऐतिहासिक कामगिरींच्या सन्मानार्थ तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

Comments
Add Comment

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ

Pakistan's war threats : पाकिस्तानच्या युद्धाच्या धमक्यांना भारताचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला सिंधू जल करार आणि युद्धाबाबत दिलेल्या

Union Education Minister Dharmendra Pradhan : पेपर माफियांवर कारवाई करणार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : पेपर लीक प्रकरणात सहभागी घटकांवर कठोर कारवाई केली जाईल असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग