National Technology Day : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त (National Technology Day) देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी देशातील शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाची आणि त्यांच्या समर्पणाची आठवण करून दिली. देशाचे शास्त्रज्ञ हे भारताच्या गौरव आणि स्वाभिमानाचे खरे शिल्पकार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.


पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले की, “आपण आपल्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाची अभिमानाने आठवण करतो. त्यांच्या अथक मेहनतीमुळेच १९९८ मध्ये पोखरण येथे यशस्वी अणुचाचण्या शक्य झाल्या. तो ऐतिहासिक क्षण भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा आणि दृढ संकल्पाचा प्रतीक होता.” ते पुढे म्हणाले की, ‘आत्मनिर्भर भारत’ उभारण्यात तंत्रज्ञान हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. तंत्रज्ञानामुळे नवकल्पनांना गती मिळत असून विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. नव्या प्रतिभांना सक्षम करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले, जेणेकरून देशाची प्रगती आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता येतील.



एका अन्य पोस्टमध्ये पंतप्रधानांनी (Narendra Modi) लिहिले की, “१९९८ मधील पोखरण अणुचाचण्यांनी भारताच्या अद्भुत शक्तीची जगाला ओळख करून दिली.” यावेळी त्यांनी आपल्या ‘सुभाषितम्’ मालिकेतील एक संस्कृत श्लोकही शेअर केला; “अग्निर्मूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम्। अपां रेतांसि जिन्वति॥” या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी म्हटले की, “अग्नी ही द्युलोकातील सर्वोच्च शक्ती असून पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा मूलस्रोत आहे. हेच अग्नितत्त्व पदार्थाच्या सूक्ष्म कणांमध्ये दडलेल्या अपरिमित शक्तीला जागृत करते आणि संपूर्ण सृष्टीत ऊर्जा व गती निर्माण करते.”





उल्लेखनीय म्हणजे, ११ मे १९९८ रोजी भारताने ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत यशस्वी अणुचाचण्या केल्या होत्या. याच दिवशी स्वदेशी ‘हंसा-३’ विमानाने पहिले उड्डाणही केले होते. या ऐतिहासिक कामगिरींच्या सन्मानार्थ तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

Comments
Add Comment

Ashish Shelar : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला आशिष शेलारांची तत्पर साथ; खात्यांतर्गत घेतले ३ मोठे निर्णय!

मुंबई : मध्य पूर्वेमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यामध्ये मोठे अडथळे

Chandranath Rath Death : मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीयाच्या हत्येचा उलगडा; ३ आरोपी जेरबंद, एका 'UPI' पेमेंटमुळे लागला छडा!

कोलकाता : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी (Suvendhu Adhikari) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी चंद्रनाथ रथ (Chandranath Rath)

India–Pakistan border High-Alert : श्रीगंगानगरमध्ये हाय-अलर्ट वाढवला; सीमाभागात १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत कडक निर्बंध लागू

राजस्थान : राजस्थानमधील श्रीगंगानगर (Sri Ganganagar) येथे सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट कायम ठेवला असून भारत - पाकिस्तान

Sanjeev Arora in ED custody : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना सात दिवसांची ईडी कोठडीत

- - १५७ कोटींच्या बनावट व्यवहारांचा आरोप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले पंजाब सरकारमधील मंत्री Sanjeev Arora

Vijay Thalapathy : चंदेरी पडदा ते मुख्यमंत्र्यांची खुर्ची; तामिळनाडूमध्ये ‘थलपती’ यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

तमिळगा वेत्री कळघम (TVK) चे अध्यक्ष विजय थलपती यांनी आज म्हणजेच रविवार १० मे रोजी तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री

The Indian Coast Guard : आयसीजीएस अचल भारतीय तटरक्षक दलात दाखल

पणजी : भारतीय तटरक्षक दलाने गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे, नवीन पिढीच्या अदम्य -श्रेणीतील जलद गस्ती जहाज मालिकेतील