National Technology Day : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त (National Technology Day) देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी देशातील शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाची आणि त्यांच्या समर्पणाची आठवण करून दिली. देशाचे शास्त्रज्ञ हे भारताच्या गौरव आणि स्वाभिमानाचे खरे शिल्पकार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.


पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले की, “आपण आपल्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाची अभिमानाने आठवण करतो. त्यांच्या अथक मेहनतीमुळेच १९९८ मध्ये पोखरण येथे यशस्वी अणुचाचण्या शक्य झाल्या. तो ऐतिहासिक क्षण भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा आणि दृढ संकल्पाचा प्रतीक होता.” ते पुढे म्हणाले की, ‘आत्मनिर्भर भारत’ उभारण्यात तंत्रज्ञान हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. तंत्रज्ञानामुळे नवकल्पनांना गती मिळत असून विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. नव्या प्रतिभांना सक्षम करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले, जेणेकरून देशाची प्रगती आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता येतील.



एका अन्य पोस्टमध्ये पंतप्रधानांनी (Narendra Modi) लिहिले की, “१९९८ मधील पोखरण अणुचाचण्यांनी भारताच्या अद्भुत शक्तीची जगाला ओळख करून दिली.” यावेळी त्यांनी आपल्या ‘सुभाषितम्’ मालिकेतील एक संस्कृत श्लोकही शेअर केला; “अग्निर्मूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम्। अपां रेतांसि जिन्वति॥” या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी म्हटले की, “अग्नी ही द्युलोकातील सर्वोच्च शक्ती असून पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा मूलस्रोत आहे. हेच अग्नितत्त्व पदार्थाच्या सूक्ष्म कणांमध्ये दडलेल्या अपरिमित शक्तीला जागृत करते आणि संपूर्ण सृष्टीत ऊर्जा व गती निर्माण करते.”





उल्लेखनीय म्हणजे, ११ मे १९९८ रोजी भारताने ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत यशस्वी अणुचाचण्या केल्या होत्या. याच दिवशी स्वदेशी ‘हंसा-३’ विमानाने पहिले उड्डाणही केले होते. या ऐतिहासिक कामगिरींच्या सन्मानार्थ तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

Comments
Add Comment

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

Liquor Ban : दारू मिळणारच नाही...ओल्ड मॉन्क सह 'या' प्रसिद्ध ब्रँड्सवर बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील लोकप्रिय आणि

Melody Tiramisu Flavour : 'मेलोडी'चा नवीन इटालियन ट्विस्ट! मोदींनी मेलोनींना दिलेल्या 'त्या' गिफ्टवरून पारलेने लाँच केला 'Melody Tiramisu'!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्यातील

NEET UG Counselling 2026 : नीट यूजी काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया!

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

CJP Protest Case : 'गुन्हेगारांना सोडणार नाही'; CJP आंदोलन प्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट विधान

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांविरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल करण्यात

Kangana Ranaut : "होय, मी मवाळ हिंदू होते; पण आता...भूतकाळातील टीकेवर कंगना रणौतचे टीकाकारांना चोख उत्तर

नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना