'Swayambhu' Movie : ‘पुष्पा’च्या जंगलात रंगलं ‘स्वयंभू’चं शूटिंग! दिग्दर्शकांचा खुलासा; टीम पावसामुळे दोन दिवस डोंगरावर अडकली

मुंबई :  ‘स्वयंभू’चा टीझर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः ‘कार्तिकेय २’च्या (Karthikeya 2) मोठ्या यशानंतर अभिनेता निखिल सिद्धार्थचा हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वाधिक प्रतिक्षित प्रोजेक्ट्सपैकी एक मानला जात आहे. भव्य स्केल, दमदार अॅक्शन आणि सिनेमॅटिक व्हिज्युअल्सने सजलेल्या या टीझरने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यातच नुकतंच रिलीज झालेलं ‘रा रा धीवरा’ हे गाणंही सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये चांगलंच लोकप्रिय ठरत आहे.


‘स्वयंभू’ हा केवळ एक ऐतिहासिक किंवा अॅक्शनपट नसून अत्यंत मोठ्या प्रमाणावर उभारलेला मेगा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी प्रत्यक्ष दुर्गम जंगलांमध्ये जाऊन शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. या अनुभवाबद्दल बोलताना दिग्दर्शक भरत कृष्णमाचारी यांनी अनेक रंजक खुलासे केले.



भरत कृष्णमाचारी म्हणाले, “चित्रपटातील लाईव्ह-अॅक्शन सीक्वेन्ससाठी आम्ही आंध्र प्रदेशातील राजामुंद्रीजवळ असलेल्या मारेडुमिल्ली जंगलांची निवड केली होती. विशेष म्हणजे, हाच तो परिसर आहे जिथे ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटातील अनेक जंगलातील सीन्स शूट करण्यात आले होते. मात्र आम्हाला त्याच लोकेशन्सवर शूट करायचं नव्हतं. आम्ही अशा नैसर्गिक जागा शोधल्या जिथे याआधी कधीच शूटिंग झालं नव्हतं.”


ते पुढे म्हणाले, “त्या ठिकाणी पोहोचणं हेच आमच्यासाठी एखाद्या अॅडव्हेंचरसारखं होतं. डोंगराच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी आम्हाला जवळपास २ ते २.५ तास जीपमधून प्रवास करावा लागत होता. एका शूटिंग शेड्यूलदरम्यान अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि आमच्या टीममधील काही सदस्य आवश्यक सामानाशिवाय जवळपास दोन दिवस डोंगरावर अडकून पडले होते. त्या परिस्थितीत शूटिंग करणं खरंच खूप आव्हानात्मक होतं.”



याशिवाय त्यांनी आणखी एक खास गोष्ट सांगितली. “त्या सुंदर आणि पूर्णपणे अनस्पर्शित लोकेशनवर शूटिंग करण्यासाठी परवानगी मिळवणाऱ्या पहिल्या काही टीम्समध्ये आमच्या टीमचा समावेश होता. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणचा नैसर्गिक आणि भव्य अनुभव कॅमेऱ्यात टिपता आला,” असंही त्यांनी नमूद केलं.


‘स्वयंभू’चा टीझर भारताच्या गौरवशाली सुवर्णयुगाची झलक दाखवतो. वारसा, परंपरा, शौर्य आणि सांस्कृतिक वैभव यांचा संगम या कथेमध्ये दिसून येतो. विशेषतः ‘सेंगोल’सारख्या प्रतीकात्मक घटकांमुळे चित्रपटाला ऐतिहासिक आणि भावनिक वजन प्राप्त झालं आहे. टीझरमध्ये निखिल सिद्धार्थ अत्यंत दमदार आणि प्रभावी लूकमध्ये दिसत असून त्यांच्या भूमिकेची झलक चाहत्यांना खूपच आवडली आहे. भव्य दृश्यरचना, गडद नाट्य आणि थरारक अॅक्शन सीक्वेन्समुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.


या चित्रपटासाठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज टेक्निशियन आणि क्रिएटिव्ह टॅलेंट एकत्र आले आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन भरत कृष्णमाचारी यांनी केलं असून संगीत दिग्दर्शन रवि बसरूर यांनी केलं आहे. ‘केजीएफ’ आणि ‘सालार’सारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्ध असलेल्या रवि बसरूर यांच्या संगीतामुळे चित्रपटाची भव्यता आणखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. तर छायाचित्रणाची जबाबदारी ‘बाहुबली’ (Baahubali) आणि ‘आरआरआर’ (RRR) सारख्या सुपरहिट चित्रपटांवर काम केलेल्या केके सेंथिल कुमार यांनी सांभाळली आहे. एडिटिंग तम्मिराजू यांनी केलं असून त्यांचाही ‘बाहुबली’सारख्या भव्य चित्रपटांशी संबंध राहिला आहे.


विशेष म्हणजे, या चित्रपटाचं शूटिंग तब्बल १७० दिवस चाललं. त्यामुळे ‘स्वयंभू’ हा अलीकडच्या काळातील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी आणि भव्य भारतीय चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.


‘स्वयंभू’ची निर्मिती भुवन आणि श्रीकर यांनी पिक्सल स्टुडिओजच्या बॅनरखाली केली आहे. भारताच्या समृद्ध इतिहासाला, सांस्कृतिक वारशाला आणि शाश्वत गौरवाला समर्पित असलेला हा भव्य चित्रपट समर २०२६ मध्ये जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Add Comment

Sunny Deol Batwara 1947 : 'बटवारा १९४७' च्या प्रदर्शनाआधी सनी देओल नतमस्तक; मुलगा करणसोबत घेतले गुरु गोविंद सिंग यांचे आशीर्वाद!

पटना : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बटवारा १९४७' (Batwara 1947) मुळे सध्या

Salman Khan : सलमान खानच्या वजनात मोठी घट, अखेर सत्य आलं समोर

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता तो

Kangana Ranaut : "होय, मी मवाळ हिंदू होते; पण आता...भूतकाळातील टीकेवर कंगना रणौतचे टीकाकारांना चोख उत्तर

नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना

Actress Devolina Bhattacharjee : "माझ्या आईला वाचवा..."; आसामच्या पुरात अडकलेल्या कुटुंबाबद्दल बोलताना गोपी बहू भावूक

मुंबई : आसाममधील भीषण पुरामुळे (Assam floods) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून लाखो नागरिक या नैसर्गिक आपत्तीने

Sai Pallavi : सुप्रसिद्ध अभिनेत्रीने २ कोटी रुपयांची जाहिरात नाकारली

दाक्षिणात्य (South Indian ) अभिनेत्री साई पल्लवी 'रामायण' चित्रपटात सीतेची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये तिचा लूक समोर

Sonu Nigam : "मला गाण्यापासून रोखू शकता, पण...सोनू निगमचा मोठा खुलासा म्हणाला; 'त्या' एका निर्णयामुळे बॉलिवूड म्युझिक कंपन्यांनी घातली होती बंदी!

मुंबई : आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात पार्श्वगायक सोनू निगम यांनी