Narendra Modi Eknath Shinde Meet : शपथविधी बंगालचा, चर्चा मात्र मोदी-शिंदेंची! मंचावरील हास्यकल्लोळाने वेधले संपूर्ण देशाचे लक्ष; नेमकं काय घडलं ?

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासातील एक सुवर्णपान आज पलटले गेले. कोलकाता येथील ऐतिहासिक 'ब्रिगेड परेड मैदाना'वर हजारो कार्यकर्त्यांच्या अथांग जनसागराच्या साक्षीत शुभेंदू अधिकारी यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या अभूतपूर्व आणि भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह 'एनडीए'च्या अनेक दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनीही आवर्जून हजेरी लावली होती. सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच राज्यांतील आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची अत्यंत आस्थेने भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.



पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंच्या दिलखुलास गप्पांनी वेधले सर्वांचे लक्ष




मंचावर अनेक राज्यांचे दिग्गज नेते उपस्थित असले तरी, राजकीय वर्तुळाच्या आणि प्रसारमाध्यमांच्या नजरा खिळल्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर! मोदी मंचावरील इतर नेत्यांची औपचारिक भेट घेत पुढे जात असताना, एकनाथ शिंदे यांच्याजवळ ते अधिक वेळ थांबल्याचे पाहायला मिळाले. दोघांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याने हस्तांदोलन झाले आणि काहीतरी दिलखुलास गप्पा रंगल्या. मोदींच्या एका वाक्यावर एकनाथ शिंदे खळखळून हसताना दिसले. मंचावरील या दोघांच्या अप्रतिम 'केमिस्ट्री'चा आणि हास्यकल्लोळाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या आनंदोत्सवाला शुभेंदू अधिकारी यांच्या ऐतिहासिक विजयाची किनार आहे. अधिकारी यांनी यंदा नंदीग्राम आणि खुद्द माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या 'भवानीपूर' अशा दोन्ही मतदारसंघांतून दणदणीत विजय मिळवला. २०२१ प्रमाणेच यंदाही त्यांनी ममतादीदींना थेट पराभवाची धूळ चारून आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.



विद्यार्थी नेता ते राज्याचे मुख्यमंत्री


१५ डिसेंबर १९७० रोजी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांती येथे जन्मलेल्या शुभेंदू अधिकारी यांचा विद्यार्थी नेता ते राज्याचे मुख्यमंत्री हा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षमय आणि थक्क करणारा राहिला आहे. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी चळवळीतून सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवलेल्या अधिकारी यांनी आपल्या कारकिर्दीची अनेक वर्षे तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) व्यतीत केली. २००७ च्या ऐतिहासिक 'नंदीग्राम आंदोलना'तील त्यांच्या आक्रमक नेतृत्वाने त्यांना देशपातळीवर मोठी ओळख मिळवून दिली, ज्याच्या जोरावर ते २००९ मध्ये पहिल्यांदा खासदार आणि २०१६ मध्ये नंदीग्राममधून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, २०२० मध्ये त्यांनी ममतादीदींशी आणि तृणमूलशी फारकत घेत राजकीय दिशा बदलली आणि अधिकृतपणे भाजपचा (BJP) झेंडा हाती घेतला. या पक्षांतराचा सर्वात मोठा धक्का त्यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत दिला, जेव्हा नंदीग्राममध्ये खुद्द ममता बॅनर्जींचा पराभव करून ते देशाच्या राजकारणात 'जायंट किलर' ठरले. याच यशाची आणि संघर्षाची मालिका पुढे नेत आता २०२६ मध्ये ते थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असून, त्यांच्या या रंजक वाटचालीवर एका ऐतिहासिक यशाचे शिक्कामोर्तब झाले आहे.



पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल - २०२६


भारतीय जनता पक्ष (BJP): २०७ जागा (निर्विविवाद बहुमतासह ऐतिहासिक विजय)


तृणमूल काँग्रेस (TMC): ८० जागा (१५ वर्षांची सत्ता गमावून मोठा धक्का)


राष्ट्रीय काँग्रेस: ०२ जागा


डावे पक्ष (Left): ०२ जागा


इतर: ०२ जागा


एकूण जागा: २९३

Comments
Add Comment

Rajkot Accident : राजकोटमध्ये भरधाव रिक्षाने वृद्ध महिलेला दिली जाेरदार धडक, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

राजकोट : गुजरात मधील राजकोट येथील १५० फीट रिंग रोडवरील आंबेडकर चौकाजवळ एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर

Kanwar Yatra 2026 : २०२६ ची कावड यात्रा सुरू; जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि इतर महत्त्वाची माहिती

दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो शिवभक्तांच्या आतुरतेने वाट पाहिली जाणारी कावड यात्रा (Kanwar Yatra 2026) आजपासून अधिकृतपणे

India-Pakistan POK : अमेरिकी वृत्तपत्रात ‘पाकिस्तानी काश्मीर’ असा उल्लेख, भारताने नोंदवला तीव्र आक्षेप

नवी दिल्ली : अमेरिकेतील भारतीय दूतावासाने एका अमेरिकन वर्तमानपत्राच्या वृत्ताच्या मथळ्यावर तीव्र आक्षेप

Food Safety : रंगीबेरंगी फ्रायम्स अन् पापड खात असाल तर सावधान! कर्करोग आणि किडनीचा मोठा धोका; तमिळनाडू अन्न सुरक्षा विभागाचा इशारा

चेन्नई : पापड, अप्पलम आणि तळलेले रंगीबेरंगी फ्रायम्स (Fryums) हे भारतात अतिशय आवडीने खाल्ले जाणारे अन्नपदार्थ आहेत.

Soanm Wangchuk : मोदी सरकारविरुद्ध उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी चक्क आता केलं मोदी सरकारचं कौतुक; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Soanm Wangchuk)

India Slams NYT : 'पाकिस्तानी काश्मीर असा कोणताही प्रकार नाही!' – 'द न्यूयॉर्क टाईम्स'च्या रिपोर्टवर भारताने सुनावले खडेबोल!

वॉशिंग्टन : पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (PoK) सध्या तिथल्या जनतेवर आणि आंदोलकांवर