Suvendhu Adhikari : पश्चिम बंगालमध्ये 'अधिकारी' राज! शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी (R.N. Ravi) यांनी आज सकाळी ११ वाजता शुभेंदू अधिकारी यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. हा भव्य शपथविधी सोहळा कोलकाता येथील अत्यंत प्रसिद्ध अशा 'ब्रिगेड परेड ग्राउंड'वर पार पडला. शुभेंदू अधिकारी  यांच्यासोबत आणखी आमदारांनी देखील मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. हे मैदान बंगालच्या राजकीय इतिहासातील अनेक विशाल आणि महत्त्वपूर्ण राजकीय सभांचे साक्षीदार राहिले आहे. आता याच ऐतिहासिक मैदानावरून बंगालच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे.



दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि भाजपचे शक्तीप्रदर्शन


पूर्व भारतातील भाजपचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि लक्षवेधी विजय मानला जात आहे. या विजयाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जणू संपूर्ण दिल्लीच आज कोलकातामध्ये अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, (PM Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, (Amit Shah) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Naveen) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री या दिमाखदार सोहळ्याला उपस्थित होते. या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीतून भाजपने केवळ विजयाचा आनंदच साजरा केला नाही, तर एक भक्कम राजकीय संदेशही दिला आहे.



शपथविधीसाठी 'रवींद्र जयंती'चा जाणीवपूर्वक मुहूर्त


या संपूर्ण सोहळ्यात सर्वात लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे भाजपने निवडलेला दिवस. भाजपने या शपथविधीसाठी ९ मे म्हणजेच 'रवींद्र जयंती'चा (गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती) मुहूर्त निवडला. ही केवळ योगायोग नसून, बंगाली संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा आम्ही सन्मान करतो, असा एक जाणीवपूर्वक आणि स्पष्ट सांस्कृतिक संदेश भाजपने बंगालच्या जनतेला दिला आहे. एकूणच, ममता बॅनर्जींच्या १५ वर्षांच्या सत्तेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत भाजपने मिळवलेला हा विजय आणि शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी, हा भारतीय राजकारणातील एक मोठा आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.


शुक्रवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शुभेंदू अधिकारी यांच्या नावावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब करण्यात आले. या प्रक्रियेबद्दल माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले की, "मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारी यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला नाही." यावरून पक्षात अधिकारी यांच्या नेतृत्वाला असलेला भक्कम पाठिंबा स्पष्ट होतो.



एक नाट्यमय राजकीय प्रवास


शुभेंदू अधिकारी यांची राजकीय वाटचाल एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशीच आहे. ते एकेकाळी तृणमूल काँग्रेसमधील (TMC) अंतर्गत गोटातील अत्यंत महत्त्वाचे नेते आणि पक्षाचे संकटमोचक मानले जायचे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या मतभेदांनंतर त्यांनी बंड पुकारले आणि तृणमूलला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. नुसता प्रवेशच केला नाही, तर त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान दिले आणि ते मोडूनही काढले.



भवानीपूरमध्ये दीदींचा १५ हजार मतांनी दणदणीत पराभव


या निवडणुकीत शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही अत्यंत हाय-व्होल्टेज मतदारसंघांमधून निवडणूक लढवली. भवानीपूर हा खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, अधिकारी यांनी सर्व राजकीय आडाखे खोटे ठरवत ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात तब्बल १५ हजारांहून अधिक मतांच्या घसघशीत फरकाने दारुण पराभव केला. या विजयामुळे ते राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठे 'जायंट किलर' ठरले आहेत.



भाजपची ऐतिहासिक लाट; तृणमूलचा सुपडा साफ


पश्चिम बंगालच्या जनतेने यंदा भाजपच्या बाजूने स्पष्ट आणि भक्कम कौल दिला आहे. विधानसभेच्या एकूण २९३ जागांपैकी भाजपने तब्बल २०७ जागांवर दणदणीत विजय मिळवत निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे, गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचा अक्षरशः सुपडा साफ झाला असून, त्यांचा पक्ष अवघ्या ८० जागांपर्यंत मर्यादित राहिला आहे. तृणमूल काँग्रेससाठी हा एक अनपेक्षित आणि मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Comments
Add Comment

Bengaluru News : बेंगळुरू हादरले! मुलीच्या पगारावर डोळा अन् लग्नासाठी ४० लाखांचा हट्ट; विरोध करताच वडिलांनी कॉलेजमध्येच...

बेंगळुरू : आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन करिअरमध्ये यशस्वी व्हावे आणि आनंदाने संसार थाटावा, अशी प्रत्येक

Rajkot Accident : राजकोटमध्ये भरधाव रिक्षाने वृद्ध महिलेला दिली जाेरदार धडक, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

राजकोट : गुजरात मधील राजकोट येथील १५० फीट रिंग रोडवरील आंबेडकर चौकाजवळ एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर

Kanwar Yatra 2026 : २०२६ ची कावड यात्रा सुरू; जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि इतर महत्त्वाची माहिती

दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो शिवभक्तांच्या आतुरतेने वाट पाहिली जाणारी कावड यात्रा (Kanwar Yatra 2026) आजपासून अधिकृतपणे

India-Pakistan POK : अमेरिकी वृत्तपत्रात ‘पाकिस्तानी काश्मीर’ असा उल्लेख, भारताने नोंदवला तीव्र आक्षेप

नवी दिल्ली : अमेरिकेतील भारतीय दूतावासाने एका अमेरिकन वर्तमानपत्राच्या वृत्ताच्या मथळ्यावर तीव्र आक्षेप

Food Safety : रंगीबेरंगी फ्रायम्स अन् पापड खात असाल तर सावधान! कर्करोग आणि किडनीचा मोठा धोका; तमिळनाडू अन्न सुरक्षा विभागाचा इशारा

चेन्नई : पापड, अप्पलम आणि तळलेले रंगीबेरंगी फ्रायम्स (Fryums) हे भारतात अतिशय आवडीने खाल्ले जाणारे अन्नपदार्थ आहेत.

Soanm Wangchuk : मोदी सरकारविरुद्ध उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी चक्क आता केलं मोदी सरकारचं कौतुक; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Soanm Wangchuk)