मुंबई : पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे अभिनंदन केल्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार टीका केली आहे. “भारताची लोकशाही नव्हे, तर उबाठा गटच अखेरचा श्वास घेत आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
मुंबई : मुंबईतील गोवंडी (Mumbai Govandi Area) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या अवघ्या ६ ...
तामिळनाडूमधील सत्तास्थापनेच्या चर्चांवर भाष्य करताना बन म्हणाले की, राज्यपालांना कोणाला शपथविधीसाठी बोलवायचे याचा अधिकार आहे. “जो पक्ष किंवा आघाडी बहुमत सिद्ध करेल, त्यालाच संधी दिली जाईल. लोकभावनेचा आदर राखूनच निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी उबाठा गटावर निशाणा साधत म्हटले की, “मुख्यमंत्रीपद गेल्यापासून उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट अस्वस्थ झाला आहे. जर तामिळनाडूतही त्यांना संधी हवी असेल, तर संजय राऊत यांनी समर्थनाचे पत्र घेऊन राजभवनात जावे,” असा टोला त्यांनी लगावला.
पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) आणि खैबर पख्तुनख्वाच्या सीमेवर शुक्रवारी एक अत्यंत गूढ आणि खळबळजनक घटना घडली. 'मातृभूमी' या वृत्तसंस्थेने दिलेल्या ...
काँग्रेससोबतच्या आघाडीवरूनही त्यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली. “भाजपासोबत असताना सन्मान आणि स्वाभिमान होता. मात्र काँग्रेससोबत गेल्यानंतर उबाठा गटाची अवस्था बिकट झाली आहे. काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उबाठा गटाला कमकुवत करण्याचे काम केले,” असा आरोप नवनाथ बन यांनी केला.