Narendra Modi : बंगाल, आसाम, पद्दुचेरीतील विजय हा मोदींवरील विश्वासाचा विजय

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आज भाजप नव्हे, संपूर्ण भारत जिंकला


मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम, पद्दुचेरीमध्ये भाजपचा झालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये झालेले परिवर्तन हे 'महापरिवर्तन' असल्याचे सांगत, "आज भाजप नव्हे, तर संपूर्ण भारत जिंकला आहे," असे प्रतिपादन त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित विजयोत्सवात केले.



नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत रसगुल्ले वाटून विजयोत्सव साजरा केला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. निवडणूक प्रचारातील आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले, "मी जेव्हा बंगालमध्ये गेलो होतो, तेव्हा एका पत्रकाराने विचारले होते की, ममता बॅनर्जी भाजपला बाहेरील पक्ष म्हणतात. त्यावर मी त्यांना स्पष्ट केले की, ज्यांनी भाजपची निर्मिती केली, ते श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालचेच सुपुत्र होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने बंगालचा जर कुठला पक्ष असेल, तर तो भारतीय जनता पक्षच आहे."



पश्चिम बंगालमधील ३० वर्षांचे काँग्रेसचे, ३६ वर्षांचे कम्युनिस्टांचे आणि १५ वर्षांच्या ममता बॅनर्जी यांच्या शासन काळावर मुख्यमंत्र्यांनी कडाडून टीका केली. देशाची आर्थिक ताकद असलेला बंगाल या राजवटींमध्ये मागे पडला आणि तिथे जंगलराज निर्माण झाले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या विकासाच्या व्हिजनमुळे बंगालच्या जनतेने परिवर्तन नव्हे, तर 'महापरिवर्तन' घडवून आणले, असेही त्यांनी सांगितले.



बंगालचा विजय आंतरिक सुरक्षेसाठी महत्त्वाचा


फडणवीस म्हणाले की, आसाममध्ये भाजपचे सरकार आल्यापासून आतंकवादी कारवायांना आळा बसला असून, एकट्या भाजपला तिथे स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच, बंगालचा विजय हा देशातील घुसखोरी आणि अंतर्गत हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवणारा विजय आहे. ममतादीदींनी कितीही अत्याचार केले, डोळे फोडले तरीही भाजपचा कार्यकर्ता थांबणार नाही, हे या विजयाने दाखवून दिले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



राष्ट्रीयत्त्वाचा विजय - रवींद्र चव्हाण


या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या परिश्रामाचे कौतुक केले. महाराष्ट्रातील जवळपास ६ हजार बंगाली कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन रात्रंदिवस प्रचार केला, असे नमूद करत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा विजय राष्ट्रीयत्त्वाचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. 'मोदी है तो मुमकिन है' या घोषणेचा पुनरुच्चार करत त्यांनी संपूर्ण देशभरातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.



लाचार राज्यकर्त्यांना चपराक - राधाकृष्ण विखे पाटील


पश्चिम बंगालमधील जंगलराज आणि घुसखोरीमुळे देशाला अंतर्गत धोका निर्माण झाला होता. ठराविक समाजाच्या मतांसाठी लाचार झालेल्या ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या जनतेने या निवडणुकीतून चांगलीच चपराक दिली आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजयानंतर दिली.

Comments
Add Comment

Healthcare Services : आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र जपानकडून घेणार ३ हजार ७०८ कोटींचे कर्ज

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार वैद्यकीय सुविधा आणि उच्च दर्जाचे वैद्यकीय

विधान परिषदेच्या ९ उमेदवारांना बिनविरोध निवडीचे प्रमाणपत्र

मुंबई : विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

India and Japan Relations : अस्खलित हिंदी बोलणाऱ्या सातो हितोमी जपानच्या मुंबईतील वाणिज्यदूत; मराठी शिकणार असल्याची माहिती

सातो हतामी यांनी घेतली राज्यपालांची भेट; विद्यापीठ तसेच सांस्कृतिक स्तरावर सहकार्य वाढवण्यावर चर्चा मुंबई :

Mumbai : मुंबईत ड्युटी करणाऱ्या हवालदाराने टिटवाळ्यात केली आत्महत्या

Police Sucide News : मुंबईतील यलो गेट पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या भाऊराव दगडू ढगे या ४२ वर्षीय पोलिसाने

Vijay Thalapathy : लाडक्या बहिणींना लग्नात मिळणार ८ ग्रॅम सोनं....

मुंबई : लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखी एक घोषणा केली आहे. एक आनंदाचा धक्का देणारी बातमी आपल्या लाडक्या

Mamata Banerjee the 'jalmudi' of defeat : बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांना पराभवाची ‘झालमुडी’ खाऊ घातली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला; सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी विजयाबद्दल केले अभिनंदन मुंबई : “पश्चिम