Riteish Deshmukh reaction on Nasrapur Crime: पुण्यातील नसरापूर प्रकरणावर रितेश देशमुख याचा संताप; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

पुणे: पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. एका ६५ वर्षीय नराधमाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची ही अमानुष घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख यानेही तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या तो त्याच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटामुळे चर्चेत असून, आज तो पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनासाठी गेला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्याने नसरापूर प्रकरणावर प्रतिक्रिया देत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.



नसरापूर प्रकरणावर बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, या घटनेने मन सुन्न झाले असून प्रचंड संताप येत आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षेचा संदर्भ देत सांगितले की, “त्या काळात अशा गुन्ह्यांसाठी चौरंग करण्यासारख्या कठोर शिक्षा दिल्या जात. आज अशा घटना घडतात तेव्हा खूप राग येतो. इतका राग येतो की आपल्या हातात काहीच नाही, अशी असहाय्यता जाणवते.” त्याच्या या वक्तव्याने समाजातील संताप आणि वेदना स्पष्टपणे दिसून येत आहेत.


पुढे तो म्हणाला, “आपण एवढीच अपेक्षा करू शकतो की सरकार, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांनी या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आरोपीवर कठोर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. अशा गुन्हेगारांमध्ये भीती आणि दरारा निर्माण झालाच पाहिजे, जेणेकरून कोणीही असा घृणास्पद विचार करण्याचं धाडस करणार नाही.” तसेच, अशा घटना घडल्यावर जनआक्रोश होणं स्वाभाविक असल्याचं सांगत, फास्टट्रॅक न्यायप्रक्रियेची गरज त्याने अधोरेखित केली.



तो पुढे म्हणाला, “पूर्वीचा काळ आणि आताचा काळ वेगळा आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपल्या देशात संविधान आहे आणि त्यानुसारच निर्णय घ्यावे लागतात. नियमांच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी लागते. मात्र अशा गंभीर प्रकरणांमध्ये जितक्या लवकर निर्णय घेतले जातील, तितकं समाजासाठी चांगलं ठरेल.” अशा शब्दांत रितेश देशमुख याने आपली भूमिका स्पष्ट करत न्यायव्यवस्थेने वेगाने आणि कठोरतेने पावले उचलण्याची गरज रितेशने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Aamir Khan Wedding : आमिर खान-गौरी स्प्रॅटचा खासगी विवाहसोहळा; फक्त १०० ते १५० पाहुण्यांना निमंत्रण, 'ते' दोन खास मित्र चर्चेत

मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट'(Mr. Perfectionist) आमिर खान ५ जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची बदनामी? आक्षेपार्ह थंबनेल वापरणाऱ्या युट्यूब चॅनेल्सवर सचिन गोस्वामी संतप्त!

मुंबई : लोकप्रिय विनोदी कार्यक्रम (Comedy Show) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' संदर्भात सोशल मीडिया (Social Media) आणि युट्यूब (YouTube) वर

Lock Upp 2 : राम कपूरच्या 'त्या' एका वक्तव्यावर कंगना भडकली! भर शोमध्ये अभिनेत्याला सुनावले खडेबोल; पाहा नेमकं काय घडलं...

Lock Upp 2 : लोकप्रिय अभिनेता राम कपूर (Ram kapoor) सध्या 'लॉकअप २' (Lock UPp 2) या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. शोमध्ये केलेल्या काही

Ek Hota Malin : एका रात्रीत अख्खं गाव मातीखाली गाडलं गेलं... अंगावर शहारे आणणारा 'एक होतं माळीण'चा टीझर प्रदर्शित

Ek Hota Malin Marathi Movie : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण... ३० जुलै २०१४ ची ती काळरात्र आजही महाराष्ट्र विसरलेला

Bollywood movies : जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा भडका ; 'अल्फा' ते 'धमाल 4'सह या 7 हिंदी चित्रपटांचा तडका

Bollywood movies : तुम्ही चित्रपट प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. चित्रपटप्रेमींसाठी जुलै महिना मनोरंजनाची

Akanksha Chamola : गौरव खन्नापासून विभक्त होण्यामागचं कारण आकांक्षा चमोलाने पहिल्यांदाच सांगितलं; म्हणाली, मला....

Akanksha Chamola : टीव्ही अभिनेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) यांनी विभक्त होण्याचा निर्णय