Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात समाजाला वाचवणारा शिल्पकार आहे," अशा शब्दांत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकल शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित 'कर्मयोगी एकल शिक्षक मेळावा २०२६' प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसारख्या दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.



आपल्या भाषणात नार्वेकर यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीवर भाष्य करताना सांगितले की, भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. २०४७ पर्यंत भारताला पूर्णपणे 'विकसित राष्ट्र' बनवण्याचे जे स्वप्न आपण पाहत आहोत, ते पूर्ण करण्यासाठी आपल्या युवा पिढीला 'कुशल युवा' मध्ये रूपांतरित करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. शिक्षकांमुळेच समाजातील विचार प्रगल्भ होतात आणि कोणताही समाज तोपर्यंत प्रगत करू शकत नाही, जोपर्यंत शिक्षणाची संधी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


राहुल नार्वेकर यांनी मानकर ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करताना मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांच्या प्रसिद्ध विचारांचा दाखला दिला. ते म्हणाले की, "मला वाईट प्रवृत्तींच्या हिंसेची भीती वाटत नाही, तर चांगल्या लोकांच्या शांत राहण्याची भीती वाटते." मात्र, मानकर ट्रस्ट आणि त्यांचे एकल शिक्षक शांत न बसता राज्याच्या अतिदुर्गम भागात जाऊन जे सामाजिक परिवर्तनाचे कार्य करत आहेत, ते खरोखरच वंदनीय आहे. समाजातील शेवटच्या स्तरावर असलेल्या आणि मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या आदिवासी बांधवांना शिक्षणाशी जोडणे, हे कार्य खऱ्या अर्थाने 'अंत्योदय' संकल्पना पूर्ण करणारे आहे.



हा भव्य सोहळा आपल्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात पार पडत असल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतुल शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कार्यामुळे आदिवासी भागातील चित्र झपाट्याने बदलत असून, हा मेळावा आगामी काळात संपूर्ण समाजासाठी एक दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Mumbai Water Storage : मुंबईवर पाणीटंचाईचं सावट गडद: तलावांत १८.८६ टक्के साठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १८.८६% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची

BMC अभियंत्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ?

मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही

MSRTC : ST BUS साठी उड्डाणपुलांखाली चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस अर्थात ‘लालपरी’साठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

मुंबई : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर

IPL प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी

IPL  2026 : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष श्री दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री

लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीचे नवे पॉवरहाऊस - नागपूर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'गोदाम लॉजिस्टिक्स पार्क'चा भव्य