First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व


मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या 'कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेने' आता आपल्या कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचा मोठा संकल्प केला आहे. संस्थेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भात देशातील पहिले 'आदिवासी विद्यापीठ' उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ५०० कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पासाठी राज्य शासनाकडे २०० एकर जमिनीची मागणी करण्यात आली असून, त्यातील १५० कोटी रुपये 'व्हिसा' आणि 'मास्टरकार्ड' सारख्या जागतिक कंपन्यांच्या CSR निधीतून, तर उर्वरित ३५० कोटी रुपये लिस्टिंगच्या माध्यमातून उभे केले जाणार आहेत. कामात पारदर्शकता आणण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ट्रस्टची नोंदणी करण्यात आली आहे. सोबतच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील ९३ तालुक्यांमध्ये 'एकल हब' उभारले जातील, ज्याद्वारे सॅटेलाइट आणि दृक-श्राव्य माध्यमांतून अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवले जाईल. नागपूर येथील पहिल्या 'एकल हब'च्या उद्घाटनानंतर आता हे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारले जाणार आहे.



दुसरीकडे, संस्थेने मुंबई महानगरपालिकेसोबतही शैक्षणिक भागीदारी केली असून पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या सामाजिक चळवळीला बळकट करण्यासाठी संस्थेने 'एक रुपया' दानाचे अभिनव आवाहन केले असून, क्यूआर कोडद्वारे संकलित होणारा हा निधी आदिवासी भागातील 'बांबू लागवडीच्या' प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसार, हा बांबू कोळशाला पर्याय म्हणून जैविक इंधन निर्मितीसाठी उपयुक्त ठरेल, ज्यामुळे प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल. येणाऱ्या काळात आपल्या एकल विद्यालयांची संख्या १,३२२ वरून ५,००० पर्यंत नेण्याचे आणि सुमारे १ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे मोठे ध्येय संस्थेने ठेवले आहे. मुंबई पोलीस, महानगरपालिका आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्या सहकार्याने सुरू असलेले हे कार्य आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनमानसात पोहोचवले जात असून, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था आता नव्या जोमाने सज्ज झाली आहे.


Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना

Extremely Severe Alert : मोबाईलवर ‘Extremely Severe Alert’! भारत सरकारची नवी आपत्ती सूचना प्रणाली चाचणी; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : तुमचा फोन अचानक वाजला आहे का? तर घाबरू नका. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण