Suresh Kumar Jaithalia : माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. परतूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेथलिया यांच्या निधनाची बातमी समजताच परतूर-मंठा मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात शोककळा पसरली असून कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.


सुरेशकुमार जेथलिया हे परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. आमदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांवर मोठ्या प्रमाणात भर दिला. रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करत अनेक विकासकामे मार्गी लावली.



सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे, त्यांच्या अडचणी समजून घेणारे आणि प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधणारे नेतृत्व म्हणून सुरेशकुमार जेथलिया यांची वेगळी ओळख होती. कार्यकर्त्यांमध्ये त्यांची मजबूत पकड होती. १५ मे २०२५ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी हा राजकीय निर्णय घेतला होता. नुकत्याच पार पडलेल्या परतूर नगर परिषद निवडणुकीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. अत्यंत काट्याच्या लढतीत नगराध्यक्षपद थोडक्यात हुकले असले, तरी त्यांच्या निवडणूक नियोजनशैलीची सर्वत्र चर्चा झाली होती. शेवटपर्यंत कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.



दरम्यान, सुरेशकुमार जेथलिया यांच्या अचानक झालेल्या निधनाने परतूर-मंठा मतदारसंघाने एक अभ्यासू, विकासाभिमुख आणि लोकांशी घट्ट नाळ जुळलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra rain update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; पालघर, रायगडला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

मुंबई : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी विविध

Navale Bridge traffic rule : पुण्यात नवले ब्रिज मार्गावर ४० किमी वेगमर्यादा लागू; पालखी सोहळ्यामुळे RTO चाचण्यांच्या वेळापत्रकातही बदल

पुणे : शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारती

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Police Suicide : मुंबईच्या लोकभवनात SRPF जवानाची आत्महत्या; गार्ड ड्युटीवर असताना सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

मुंबई : मलबार हिल (Malabar Hill) येथील लोकभवन (Lokbhavan) परिसरात सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. राजभवनाच्या सुरक्षेसाठी

Maharashtra school holiday : मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.