Devendra Fadnavis : "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे पण ..."; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडले स्पष्ट मत

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे आणि स्पष्ट वक्तव्य केले आहे. “महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे, पण भाषेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची हिंसा आम्ही स्वीकारणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.


पत्रकारांशी बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. अलीकडेच ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.



नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?


">ते म्हणाले, “महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे. जे शिकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे स्वागत आहे, आणि जे अजून भाषा शिकलेले नाहीत त्यांना आम्ही शिकवू.” त्यांनी यावेळी मराठी ही सुंदर आणि सोपी भाषा असल्याचे सांगत तिचा अधिकाधिक वापर व्हावा, असे आवाहन केले. भाषेच्या मुद्द्यावरून घडणाऱ्या हिंसाचारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “भाषेच्या नावावर कोणालाही मारहाण करणे किंवा हिंसा करणे हे आपल्या संस्कृतीचा भाग नाही, आणि आम्ही ते पूर्णपणे नाकारतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.



दरम्यान, सार्वजनिक वाहतूक चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयामुळे राज्यात विविध मतप्रवाह निर्माण झाले होते. त्यानंतर सरकारने चालकांसाठी मराठी शिकण्याची मुदत १ मे ऐवजी १५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. (Devendra Fadnavis)


महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. “महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले,” असे ते म्हणाले.



छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत त्यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ आजही राज्यातील जनतेला एकता आणि अभिमानाची प्रेरणा देत असल्याचे सांगितले.





Tags
maharashtraDevendra Fadnavismarathi bhashaMaharashtra newsmaharashtra din 2026
Comments
Add Comment

HSC Results 2026 : बारावीचा निकाल काही तासांवर; जाणून घ्या निकाल कुठे आणि कसा पाहता येणार?

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा २०२६ चा निकाल उद्या म्हणजेच शनिवार २ मे रोजी जाहीर होणार

Weather Update : पुढील ४८ तास अतिशय महत्त्वाचे! उष्णतेतून दिलासा, पण अवकाळीचं नवं संकट दारात; IMDचा हाय अलर्ट

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेचा कडाका शिगेला पोहोचला असून विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक

Nashik : नाशिक जिल्ह्यातील 45 हजार नावं शिधापत्रिकेच्या यादीतून हटवली, तुमचंही नाव यादीत तर नाही ना ?

नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील, 45 हजार 948 आयकरदात्यांची नावं शिधापत्रिकेच्या यादीतून

नाशिक : विभागीय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने ३५ कोटींची वर्कआॅर्डर, कुंभमेळा कामांत मोठा घोटाळा समोर

नाशिक - नाशिक व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यानिमित्त विविध विकासकामे वेगात सुरू असताना, चक्क

नाशिक : काळ्या दगडाच्या तपासासाठी खरातची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, आठव्या गुन्ह्यात खरातला थेट...

नाशिक : काळ्या दगडाच्या तपासासाठी खरातची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, आठव्या गुन्ह्यात खरातला न्यायालयीन

US And Iran War : पाकिस्तानने अमेरिकेच्या नाकेबंदी दरम्यान इराणसाठी सहा भूमार्ग केले खुले

वॉशिंग्टन : पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मुख्य मध्यस्थाची भूमिका बजावत