Madhya Pradesh Narmada cruise accident : बरगी धरणात क्रूझ बुडाले, ४ जणांचा मृत्यू,१०-१५ बेपत्ता

मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला. पर्यटकांनी भरलेली नर्मदा क्रूझ नौका खमरिया टापूजवळ असंतुलित होऊन बुडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर आजींची १०-१२ जण बेपत्ता आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेला बरगी बांध नर्मदा नदीवर बांधलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा बांध सिंचन, ९० मेगावॅट वीज निर्मिती आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे बोटिंग आणि क्रूझ सफरीसाठी दररोज पर्यटक येतात. याठिकाणी गुरुवारी, संध्याकाळी ५.३० वाजता क्रूझ पर्यटकांना घेऊन नर्मदा नदीवरील बरगी धरणात फिरत होती. अचानक हवामान बिघडले आणि जोरदार वारे सुटल्याने क्रूझमध्ये पाणी शिरू लागले. काही क्षणांतच बोट नियंत्रणाबाहेर जाऊन बुडाली.



प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अनेक प्रवासी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारताना दिसले. परिसरात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि एसडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या. गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे. अंधार आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत, तरीही शोधमोहीम सुरूच आहे.प्राथमिक माहितीनुसार, क्रूझमध्ये कॅप्टनसह सुमारे ३०-३५ लोक होते. बचाव पथकाने 15 जणांना सुरक्षित बाहेर काढले असून क्रूझ कॅप्टन महेश पटेल यांनाही नंतर वाचवण्यात आले.





मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक :


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी प्रशासनाला तातडीने बचावकार्य तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.सरकारने जाहीर केले आहे की, बचावकार्याला पूर्ण गती देण्यात आली असून बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी