मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणूकीची धांदल आता सुरु झाली आहे. आजचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश शिवसेनेत झाला, आणि शिवसेनेकडून बच्चू कडू सोबतच नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
शिवसेनेतच नीलम गोऱ्हेना विरोध
अनेक दिवसांपासून विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र शिवसेनेतीलच काही नेत्यांचा नीलम गोऱ्हे यांना विरोध होता. विधान परिषदेसाठी उमेदवारांची नावे शिवसेना जाहीर करण्याआधीच बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश शिवसेनेत झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच या निवडणुकीसाठी बच्चू कडू यांचा पक्ष शिवसेनेत पक्षप्रवेश झाला असून ...
पण हळूहळू शिवसेनेतच नीलम गोऱ्हे यांच्या नावाबाबत फूट पडताना दिसत होती. राज्यसभेप्रमाणेच नवा चेहरा विधानसभेसाठी मिळावा असा अनेकांचा आग्रह होता. अनेकांनी नीलम गोऱ्हे यांच्या उमेदवारी अर्जाबाबत विरोध दर्शवला होता, परंतु एकनाथ शिंदे यांनी हा विरोध झुगारून नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी दिल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत, या निर्णयामुळे शिवसेनेत फुट पडणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर आज म्हणजेच गुरुवार ३० एप्रिल रोजी बच्चू कडू यांनी ...
यावर एकनाथ शिंदेनी काय उत्तर दिलय ?
पद ही कमी असतात आणि जे योग्य काम करतात त्यांनाच ती पद मिळतात, माझं प्रत्येकावर लक्ष आहे. जो काम करेल तो पुढे जाईल. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, मालकांचा नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय बच्चू कडू यांचे स्वागत करताना देखील शिंदे म्हणाले की, "दिव्यांगांसाठी झटणारा नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे, शिवसेनेत तुमचं स्वागत आहे, मुळात शिवसेना तुम्हाला नवीन नाही, तुम्ही मुळात शिवसैनिक आहात, याचसोबतच महायुतीचे सर्व उमेदवार निवडूनही येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






