Breaking News : विधान परिषदेआधी मोठी घडामोड; बच्चू कडू आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याच्या मार्गावर आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष हा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज बच्चू कडू (Bachchu Kadu) विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निर्णयामुळे विशेषतः विदर्भातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.


बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती. त्यानंतर त्यांनी ‘प्रहार’च्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.



सूत्रांच्या माहितीनुसार, काल रात्री मुंबईतील ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्ष विलीनीकरण, तसेच भविष्यातील राजकीय भूमिका आणि जबाबदाऱ्यांवर सविस्तर चर्चा झाली.


मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्रहार’चा राजकीय पक्ष भाग शिवसेनेत विलीन होणार असून, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली ‘प्रहार’ संघटना मात्र स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे.



या घडामोडीनंतर पुढील काही महिन्यांत बच्चू कडू यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची तयारी सुरू असून, त्याचाच भाग म्हणून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Comments
Add Comment

BMC News : झाडांच्या फांद्या छाटणीत पक्ष्यांचे घेतले जातात जीव

- अनेक फांद्यावरील पक्ष्यांची घरटी, पिल्लांना धोका, मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत सध्या मान्सून पूर्व

BJP corporator Prakash Darekar : दहिसरच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारा

- दहिसरमध्ये कोकण भवन उभारा.. - भाजप नगरसेवक प्रकाश दरेकर यांची महापालिका अर्थसंकल्पात मागणी मुंबई (विशेष

BMC News : डॉक्टरांच्या कंत्राटी नियुक्तीवर शिवसेना नगरसेवक नाराज

- डॉक्टरांना कंत्राटी पद्धतीवर नेमू नका मुंबई (सचिन धानजी ) डॉक्टर हे कंत्राटी कसे काय असा सवाल करत डॉक्टरांना

Mithi River : मिठी नदीत डेब्रीज टाकून वाढवले जाते गाळाचे वजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदीच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत याचे २७ टक्के काम

Mumbai : पश्चिम उपनगरांतील नाल्यांची, पाणी साचण्याच्या ठिकाणांची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नदीसह मोठ्या आणि छोट्या नाल्‍यातून गाळाच्या सफाई कामे अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे

Desalinate Seawater : समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या खाऱ्या पाण्याचे रासायनिक