Breaking News : विधान परिषदेआधी मोठी घडामोड; बच्चू कडू आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याच्या मार्गावर आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष हा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज बच्चू कडू (Bachchu Kadu) विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निर्णयामुळे विशेषतः विदर्भातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.


बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती. त्यानंतर त्यांनी ‘प्रहार’च्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.



सूत्रांच्या माहितीनुसार, काल रात्री मुंबईतील ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्ष विलीनीकरण, तसेच भविष्यातील राजकीय भूमिका आणि जबाबदाऱ्यांवर सविस्तर चर्चा झाली.


मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्रहार’चा राजकीय पक्ष भाग शिवसेनेत विलीन होणार असून, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली ‘प्रहार’ संघटना मात्र स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे.



या घडामोडीनंतर पुढील काही महिन्यांत बच्चू कडू यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची तयारी सुरू असून, त्याचाच भाग म्हणून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Watermelon Death Case : मुंबईतील ‘कलिंगड डेथ केस’मध्ये मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक सत्य समोर

मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता सर्वात मोठा आणि

Mumbai Rain : उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा; मुंबईत ५ जूनपूर्वीच पावसाचे आगमन होण्याची शक्यता!

मुंबई : मुंबईकरांनो, आता छत्र्या आणि रेनकोट तयार ठेवा! प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी अखेर

आयएएस तुकाराम मुंढे आता मंत्री झिरवळ यांच्या विभागात

२१ वर्षांच्या कार्यकाळात २५वी बदली; अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार स्वीकारणार मुंबई : आपल्या कडक

मुंबईला जलमुक्त करण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

मुंबई : मुंबई महानगराची भौगोलिक रचना लक्षात घेता सखल भागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जलद आणि

आर्थिक संकटातील बेस्टची मदतीसाठी राज्य-केंद्राकडे धाव

मुंबई : बेस्टच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत उपदान (ग्रॅच्युटी)

संपूर्ण कोकणाला जलवाहतुकीने जोडणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या ३ वर्षांत मुंबई-महानगरात २७ जेट्टी कार्यान्वित करणार मुंबई : "मुंबई महानगर