Split in MVA : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून मविआत फूट

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता उबाठा गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील कुरबुरी चव्हाट्यावर आल्या आहेत. उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील तरच पाठिंबा देण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसने आता आपला स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. उबाठाने विश्वासात न घेता उमेदवार घोषित केल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसने पाच नावांची चाचपणी सुरू केली असून, यामुळे विधान परिषदेची लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.


उबाठा गटाने महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस किंवा शरद पवार गटाला विचारात न घेता परस्पर अंबादास अंबादास दानवे यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, ठाकरे स्वतः रिंगणात असतील तर त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला जाईल; मात्र अन्य कोणाचे नाव आल्यास काँग्रेस आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उमेदवार देईल. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून स्वतंत्र उमेदवार देण्याचे सूतोवाच केले आहे.


बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा


काँग्रेसकडून उमेदवारीसाठी पाच जणांची नावे चर्चेत असली, तरी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. थोरात यांचा प्रदीर्घ संसदीय अनुभव आणि राजकीय वजन पाहता त्यांना संधी देऊन उबाठाला प्रत्युत्तर देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. याशिवाय सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांचीही नावे पक्षश्रेष्ठींच्या विचाराधीन आहेत.


शरद पवार गटाची भूमिका काय?


एकीकडे काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने मात्र उबाठाला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. राज्यसभेच्या वेळी शरद पवारांना दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणून या निवडणुकीत उबाठाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. शिंदे म्हणाले, राज्यसभेवेळी आम्ही विधानसभेला उबाठाचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे विधानपरिषेदत असावे, अशी आमची मागणी होती. मात्र आता अंबादास दानवेंना त्यांनी संधी दिली आहे, तर आमची काही हरकत नाही.

Comments
Add Comment

Mithi River : मिठी नदीत डेब्रीज टाकून वाढवले जाते गाळाचे वजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदीच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत याचे २७ टक्के काम

Mumbai : पश्चिम उपनगरांतील नाल्यांची, पाणी साचण्याच्या ठिकाणांची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नदीसह मोठ्या आणि छोट्या नाल्‍यातून गाळाच्या सफाई कामे अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे

Desalinate Seawater : समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या खाऱ्या पाण्याचे रासायनिक

Mumbai News : कामाठीपुरातील ७० अनधिकृत फेरीवाले व जुने भंगार विक्रेत्यांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील विविध ठिकाणांवरील सुमारे ७० अनधिकृत फेरीवाले व

Patra Chawl : पत्रा चाळ रहिवाशांना म्हाडाकडून १० टक्के भाडेवाढ मिळणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; इमारतींची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश मुंबई : गेल्या

Bamboo Plantation : कांजूरमार्गमधील कचरा दुर्गंधीवर ‘बांबू’ लागवडीचा उपाय

उपमुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश; कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची तातडीने कार्यवाही करण्याचे