Split in MVA : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून मविआत फूट

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता उबाठा गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील कुरबुरी चव्हाट्यावर आल्या आहेत. उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील तरच पाठिंबा देण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसने आता आपला स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. उबाठाने विश्वासात न घेता उमेदवार घोषित केल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसने पाच नावांची चाचपणी सुरू केली असून, यामुळे विधान परिषदेची लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.


उबाठा गटाने महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस किंवा शरद पवार गटाला विचारात न घेता परस्पर अंबादास अंबादास दानवे यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, ठाकरे स्वतः रिंगणात असतील तर त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला जाईल; मात्र अन्य कोणाचे नाव आल्यास काँग्रेस आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उमेदवार देईल. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून स्वतंत्र उमेदवार देण्याचे सूतोवाच केले आहे.


बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा


काँग्रेसकडून उमेदवारीसाठी पाच जणांची नावे चर्चेत असली, तरी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. थोरात यांचा प्रदीर्घ संसदीय अनुभव आणि राजकीय वजन पाहता त्यांना संधी देऊन उबाठाला प्रत्युत्तर देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. याशिवाय सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांचीही नावे पक्षश्रेष्ठींच्या विचाराधीन आहेत.


शरद पवार गटाची भूमिका काय?


एकीकडे काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने मात्र उबाठाला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. राज्यसभेच्या वेळी शरद पवारांना दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणून या निवडणुकीत उबाठाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. शिंदे म्हणाले, राज्यसभेवेळी आम्ही विधानसभेला उबाठाचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे विधानपरिषेदत असावे, अशी आमची मागणी होती. मात्र आता अंबादास दानवेंना त्यांनी संधी दिली आहे, तर आमची काही हरकत नाही.

Comments
Add Comment

Rohit Sharma Retirement News : रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा; इंग्लंडविरुद्धचा सामना ठरणार शेवटचा?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज (Batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वनडे (ODI)

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

IND vs ENG : कार्डिफमध्ये इंग्लंडची बाजी; भारताला पराभूत करत मालिकेत साधली बरोबरी

कार्डिफ : जो रूट (Joe Root) याच्या नाबाद ९९ धावांच्या (Runs) शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा दुसऱ्या एकदिवसीय (ODI)

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मिरा रोड (Mira Road) येथील जेपी नॉर्थ (JP North) कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सायंकाळी बांधकाम साईटवर (Construction Site) भीषण

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे