Split in MVA : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून मविआत फूट

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता उबाठा गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील कुरबुरी चव्हाट्यावर आल्या आहेत. उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील तरच पाठिंबा देण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसने आता आपला स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. उबाठाने विश्वासात न घेता उमेदवार घोषित केल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसने पाच नावांची चाचपणी सुरू केली असून, यामुळे विधान परिषदेची लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.


उबाठा गटाने महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस किंवा शरद पवार गटाला विचारात न घेता परस्पर अंबादास अंबादास दानवे यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, ठाकरे स्वतः रिंगणात असतील तर त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला जाईल; मात्र अन्य कोणाचे नाव आल्यास काँग्रेस आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उमेदवार देईल. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून स्वतंत्र उमेदवार देण्याचे सूतोवाच केले आहे.


बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा


काँग्रेसकडून उमेदवारीसाठी पाच जणांची नावे चर्चेत असली, तरी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. थोरात यांचा प्रदीर्घ संसदीय अनुभव आणि राजकीय वजन पाहता त्यांना संधी देऊन उबाठाला प्रत्युत्तर देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. याशिवाय सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांचीही नावे पक्षश्रेष्ठींच्या विचाराधीन आहेत.


शरद पवार गटाची भूमिका काय?


एकीकडे काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने मात्र उबाठाला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. राज्यसभेच्या वेळी शरद पवारांना दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणून या निवडणुकीत उबाठाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. शिंदे म्हणाले, राज्यसभेवेळी आम्ही विधानसभेला उबाठाचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे विधानपरिषेदत असावे, अशी आमची मागणी होती. मात्र आता अंबादास दानवेंना त्यांनी संधी दिली आहे, तर आमची काही हरकत नाही.

Comments
Add Comment

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

Tribal Development : आदिवासींच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दार उघडले

- राज्य शासनाचा पुढाकार; 'शबरी नॅचरल्स' ब्रँडचे नाशिकच्या दिंडोरीत प्रक्रिया युनिट मुंबई : राज्यातील आदिवासी

Cesar Gastelum : मेक्सिकोत प्रसिद्ध टिकटॉक इन्फ्लुएन्सर सीझर गॅस्टेलम यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या; जगभरात खळबळ

मेक्सिको : सोशल मीडियाच्या आभासी जगात आपल्या अनोख्या विनोदी शैलीने लाखो प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा एक

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

Usha Nadkarni Emotional Story : वडिलांचा कोयत्याने हल्ला, आईने काढले घराबाहेर; पडद्यावर खडूस सासू, पण खऱ्या आयुष्यात... उषा नाडकर्णींची हादरवणारी कहाणी

मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील अतिशय गाजलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ आणि त्यात 'खडूस सासू' म्हणून घराघरांत