Split in MVA : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून मविआत फूट

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता उबाठा गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील कुरबुरी चव्हाट्यावर आल्या आहेत. उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील तरच पाठिंबा देण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसने आता आपला स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. उबाठाने विश्वासात न घेता उमेदवार घोषित केल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसने पाच नावांची चाचपणी सुरू केली असून, यामुळे विधान परिषदेची लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.


उबाठा गटाने महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस किंवा शरद पवार गटाला विचारात न घेता परस्पर अंबादास अंबादास दानवे यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, ठाकरे स्वतः रिंगणात असतील तर त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला जाईल; मात्र अन्य कोणाचे नाव आल्यास काँग्रेस आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उमेदवार देईल. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून स्वतंत्र उमेदवार देण्याचे सूतोवाच केले आहे.


बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा


काँग्रेसकडून उमेदवारीसाठी पाच जणांची नावे चर्चेत असली, तरी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. थोरात यांचा प्रदीर्घ संसदीय अनुभव आणि राजकीय वजन पाहता त्यांना संधी देऊन उबाठाला प्रत्युत्तर देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. याशिवाय सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांचीही नावे पक्षश्रेष्ठींच्या विचाराधीन आहेत.


शरद पवार गटाची भूमिका काय?


एकीकडे काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने मात्र उबाठाला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. राज्यसभेच्या वेळी शरद पवारांना दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणून या निवडणुकीत उबाठाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. शिंदे म्हणाले, राज्यसभेवेळी आम्ही विधानसभेला उबाठाचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे विधानपरिषेदत असावे, अशी आमची मागणी होती. मात्र आता अंबादास दानवेंना त्यांनी संधी दिली आहे, तर आमची काही हरकत नाही.

Comments
Add Comment

Ind Vs Pak Womens T-20 World Cup : भारतीय संघाला सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे आव्हान; संघात मोठे बदल होण्याची शक्यता

बर्मिंगहॅम : भारतीय महिला संघ रविवारी(१४ जून)आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गट

Raja Shivaji : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली ?

Raja Shivaji Final Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या धमाकेदार चित्रपटांची मेजवानी एकामागोमाग एक पहायला मिळत आहे. 'राजा

Shubham Gill & Sheryas Iyer : शिखर धवनचा विक्रम धोक्यात! शुभमन गिल-श्रेयस अय्यरसमोर इतिहास रचण्याची संधी

धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि स्टार फलंदाज श्रेयस

Supriya Sule : काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही

मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी सध्या

Ind vs Afg : भारत- आफगाणिस्तान पहिल्या वनडेत ओवर कट-ऑफ जाहीर

धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द

Sheetal Mhatre : सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकासात देऊबाई पाटील यांच्या स्मृती जपण्याची मागणी

शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडे पत्राद्वारे