West Bengal : विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान; ममता बॅनर्जी -सुभेंदू अधिकारी आमने सामने

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.. या टप्प्यात राज्यातील १४२ जागांचे भवितव्य ठरणार आहे. तृणमूल काँग्रेस आपला दक्षिण बंगालचा बालेकिल्ला राखणार की भाजप सत्ता खेचण्यात यशस्वी होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याआधी पार पडलेल्या पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी तब्बल 91 टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मतदानाचा हा दुसरा टप्पा राज्याची राजकीय दिशा ठरवणारा आहे. ( West Bengal Legislative Assembly Election)


ममता बॅनर्जी -सुभेंदू अधिकारी आमने सामने


या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागून असलेली निवडणूक ही भवानीपूर मतदारसंघात पार पडत आहेत. भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि भाजप नेते सुभेंदू अधिकारी (Mamata Banerjee Vs Subhendu Adhikari ) यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही लढत या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची ठरत आहे. दरम्यान निवडणुकीच्या या दुसऱ्या टप्प्यात उत्तर-२४ परगणामध्ये ३३ जागा, दक्षिण-२४ परगणातील ३१ जागा , हावडातील १६ जागा , नदिया येथील १७ जागा, हुगळी येथील १८ जागा तर पूर्व बर्धमानमधील १६ जागा आणि कोलकात्यातील ११ जागांचा समावेश आहे. ( West Bengal Election )


विधानसभा निवडणुकीच्या या दुसऱ्या टप्प्यात आज ३.२१ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात १.६४ कोटी पुरुष व १.५७ कोटी महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १८-१९ वर्षांचे ४.१२ लाख नवमतदार यंदा मतदान करतील. राज्यात सोमवारी सायंकाळी प्रचार थंडावला असला तरी राजकारण मात्र तापलेले आहे. राजकीय समीक्षकांनुसार, दक्षिण बंगाल जिंकल्याशिवाय बंगालची सत्ता मिळवणे अशक्य आहे. २०२१ च्या निवडणुकीत या १४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने १२३ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ १८ जागा मिळाल्या होत्या.


भ्रष्टाचार, घुसखोरी अन... भाजपच आक्रमक प्रचार


भ्रष्टाचार, घुसखोरी, निवडणूक पश्चात हिंसाचार आणि महिला सुरक्षा या मुद्द्यांवर भाजपने आक्रमक प्रचार केला. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांनी मतदानानंतर ६० दिवस केंद्रीय दले बंगालमध्येच राहतील, असे आश्वासन सोमवारी मतदारांना दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आपला गड कायम राखणार की यंदा भाजप विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी जाहीर होणार असून, त्यानंतर राज्यात सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती येणार हे स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Ind Vs Pak Womens T-20 World Cup : भारतीय संघाला सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे आव्हान; संघात मोठे बदल होण्याची शक्यता

बर्मिंगहॅम : भारतीय महिला संघ रविवारी(१४ जून)आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गट

Shubham Gill & Sheryas Iyer : शिखर धवनचा विक्रम धोक्यात! शुभमन गिल-श्रेयस अय्यरसमोर इतिहास रचण्याची संधी

धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि स्टार फलंदाज श्रेयस

Short Film : राज्य शासनाकडून बालचित्रपट निर्मितीला चालना; माहितीपट व लघुपटांसाठी अर्थसहाय्यात मोठी वाढ

मुंबई, राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Suraj Chavan : लवकरच आई-बाबा होणार सुरज-संजना; डोहाळेजेवणाचे खास फोटो-व्हिडीओ व्हायरल

मुंबई : 'Bigg Boss Marathi 5' चा विजेता (Winner) आणि लोकप्रिय रीलस्टार (Reel Star) सुरज चव्हाण (Suraj Chavan) आणि त्याची पत्नी संजना गोफणे (Sanjana Gofane)

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील