Bacchu Kadu, Eknath Shinde : विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन - बच्चू कडू

मुंबई : "उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाईक म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे", अशी भूमिका माजी मंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी स्पष्ट केली.


प्रहार पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने कडू यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही, तर मुद्द्यांसाठी युती करणारा कार्यकर्ता आहे. केवळ आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष विलीन करेल, इतका मी नालायक नाही.”



उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाईक म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. मात्र, हे करत असताना दिव्यांग बांधव, शेतकरी आणि शेतमजूर हेच आमच्यासाठी सर्वोच्च असतील. प्रहार संघटनेचे एक लाखांहून अधिक सदस्य असून, ही संघटना स्वाभिमानाने उभी राहिली आहे. विलीनीकरणाच्या बातम्या पाहून दुःख झाले, अशा चर्चा केवळ वावड्या असल्याचे कडू यांनी सांगितले.



१९९९ मध्ये स्थापन झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने नेहमीच आक्रमक आंदोलनांची भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या वेळी बच्चू कडू सुरुवातीला त्यांच्यासोबत होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला. त्या निवडणुकीत ३८ जागा लढवूनही यश मिळाले नसले तरी, प्रहारला दीड टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. आता विधान परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिंदे गट आणि कडू यांच्यात जवळीक निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील