Bacchu Kadu, Eknath Shinde : विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन - बच्चू कडू

मुंबई : "उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाईक म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे", अशी भूमिका माजी मंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी स्पष्ट केली.


प्रहार पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने कडू यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही, तर मुद्द्यांसाठी युती करणारा कार्यकर्ता आहे. केवळ आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष विलीन करेल, इतका मी नालायक नाही.”



उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाईक म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. मात्र, हे करत असताना दिव्यांग बांधव, शेतकरी आणि शेतमजूर हेच आमच्यासाठी सर्वोच्च असतील. प्रहार संघटनेचे एक लाखांहून अधिक सदस्य असून, ही संघटना स्वाभिमानाने उभी राहिली आहे. विलीनीकरणाच्या बातम्या पाहून दुःख झाले, अशा चर्चा केवळ वावड्या असल्याचे कडू यांनी सांगितले.



१९९९ मध्ये स्थापन झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने नेहमीच आक्रमक आंदोलनांची भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या वेळी बच्चू कडू सुरुवातीला त्यांच्यासोबत होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला. त्या निवडणुकीत ३८ जागा लढवूनही यश मिळाले नसले तरी, प्रहारला दीड टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. आता विधान परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिंदे गट आणि कडू यांच्यात जवळीक निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Watermelon Death Case : कलिंगड खाल्लं अन् एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; दुकानदारानेच सांगितलं सत्य

मुंबई : बिर्याणी त्यानंतर थंडावा मिळावा म्हणून खाल्लेलं कलिंगड आणि थेट मृत्यू किती भयंकर आहे ना हे, मुंबईतील

Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७

BMC News : मुंबईतील नालेसफाईचे काम सुमारे ३९ टक्के

यंदा मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्याचे प्रमाण होणार कमी दादर, माटुंगा रोड येथीलही तुंबई होणार कमी मुंबई