Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना घडल्या आणि पवार कुटुंब राजकारणामुळे विभक्त होण्याच्या चर्चा रंगू लागल्या, पण त्या चर्चांना पूर्णविराम देत आज शरद पवारांनी संपूर्ण पवार कुटुंबाला स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे.



पवार कुटुंबाच्या भेटीचे कारण काय ?


या भेटीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी कुटुंबातील सर्व सदस्य या स्नेहभोजनसाठी हजर राहणार आहेत. शरद पवार सध्या पुण्यातील मोदीबागमध्ये वास्तव्यास आहेत. या ठिकाणी पवार कुटुंब एकत्र भेटणार आहेत. कौटुंबिक आणि राजकारणातील अनेक घडामोडी सध्या पवार कुटुंबात घडत आहेत. रेवती सुळेचं लग्न शिवाय रोहित पवार, जय पवार यांची आगामी निवडणुकांविषयी वक्तव्य या पार्श्वभूमीवर हे स्नेहभोजन होत आहे.




सुनेत्रा पवार आणि जय, पार्थ पवार राहणार उपस्थित ?


'पवार विरुद्ध पवार' अशा संघर्षांला तोंड फुटत असताना पवार कुटुंबीयांची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. सायंकाळी ५ वाजता मोदीबागेत पवार कुटुंब हजर राहणार असून, सुनेत्रा पवार सध्या मुंबईत आहेत, सुनेत्रा पवार जाणार की नाही?याकडे सर्वांच्या नजरा आहेत. जय पवार बाहेर असल्याने या कार्यक्रमाला अनुउपस्थित राहू शकतात अशा चर्चा आहेत.




कौटुंबिक की राजकीय भेट ?


मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी बोलावलेली ही भेट कौटुंबिक असून कोणताही राजकीय चर्चा होणार नसल्याची माहिती आहे. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून ते सध्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता पार पडणाऱ्या या स्नेहभोजनाला कोण उपस्थित राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली