Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना घडल्या आणि पवार कुटुंब राजकारणामुळे विभक्त होण्याच्या चर्चा रंगू लागल्या, पण त्या चर्चांना पूर्णविराम देत आज शरद पवारांनी संपूर्ण पवार कुटुंबाला स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे.



पवार कुटुंबाच्या भेटीचे कारण काय ?


या भेटीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी कुटुंबातील सर्व सदस्य या स्नेहभोजनसाठी हजर राहणार आहेत. शरद पवार सध्या पुण्यातील मोदीबागमध्ये वास्तव्यास आहेत. या ठिकाणी पवार कुटुंब एकत्र भेटणार आहेत. कौटुंबिक आणि राजकारणातील अनेक घडामोडी सध्या पवार कुटुंबात घडत आहेत. रेवती सुळेचं लग्न शिवाय रोहित पवार, जय पवार यांची आगामी निवडणुकांविषयी वक्तव्य या पार्श्वभूमीवर हे स्नेहभोजन होत आहे.




सुनेत्रा पवार आणि जय, पार्थ पवार राहणार उपस्थित ?


'पवार विरुद्ध पवार' अशा संघर्षांला तोंड फुटत असताना पवार कुटुंबीयांची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. सायंकाळी ५ वाजता मोदीबागेत पवार कुटुंब हजर राहणार असून, सुनेत्रा पवार सध्या मुंबईत आहेत, सुनेत्रा पवार जाणार की नाही?याकडे सर्वांच्या नजरा आहेत. जय पवार बाहेर असल्याने या कार्यक्रमाला अनुउपस्थित राहू शकतात अशा चर्चा आहेत.




कौटुंबिक की राजकीय भेट ?


मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी बोलावलेली ही भेट कौटुंबिक असून कोणताही राजकीय चर्चा होणार नसल्याची माहिती आहे. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून ते सध्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता पार पडणाऱ्या या स्नेहभोजनाला कोण उपस्थित राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ

नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात

नाशिक Nashik : नाशिकमध्ये ACB पथकाने मोठी कारवाई करत जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ

क्रिकेटची मॅच संपली अन् दोन्ही गट भिडले ; भर मैदानात सांडला रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं ?

जळगाव : क्रिकेटचं मैदान म्हणजे दोन गट आमने सामने असणारच. इंटरनॅशनल मॅच असो वा गल्लीतल्या पोरांची मॅच, भांडणं

खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर