पाकिस्तानला फुटणार घाम ! रशियाने भारताला दिली मोठी गुड न्यूज, लवकरच...

नवी दिल्ली : भारतासाठी मोठी आनंदाची बातमी मात्र पाकिस्तानला घाम फोडणारी अशी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानला भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टमने आणि एअर डिफेन्सच्या नारी शक्तीने चांगलाच दणका दिला होता. भारताच्या S-400 समोर पाकिस्तानची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अगदी निष्प्रभ ठरले होते. अशातच आता याच S-400 डिफेन्स सिस्टमबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.


भारताला रशियाची पुन्हा साथ मिळाली असून रशियाकडून आता काही दिवसांत S-400 ची नवी खेप मिळणार आहे. रशियाने भारतासाठी चौथी S-400 एअर डिफेन्स सिस्टम रवाना केली आहे. मे महिन्याच्या अखेरीस ही प्रणाली तैनात होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताची सुरक्षा आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. ही नवीन S-400 प्रणाली राजस्थानमध्ये तैनात केली जाण्याची शक्यता आहे.


एका वृत्तानुसार रशियाने चौथी S-400 प्रणाली भारताकडे पाठवली आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही सिस्टम भारतीय बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर पाचवी S-400 प्रणाली यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात पोहचण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान याच S-400 ने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तिच्यासमोर शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांच्या सर्व योजना फसल्या होत्या. आता आणखी प्रणाली भारतात दाखल होत असल्याने भारताची ताकद आणखी वाढली आहे.


मोदी सरकारने आधीच आणखी पाच S-400 एअर डिफेन्स सिस्टम खरेदी करण्यास मंजुरी दिलेली आहे. या प्रणालींमध्ये पाकिस्तानमधील कोणतेही हवाई लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता आहे. याची मारक क्षमता सुमारे 400 किलोमीटरपर्यंत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारताने 2018 मध्ये रशियासोबत पाच S-400 लाँग-रेंज सरफेस-टू-एअर मिसाइल सिस्टमसाठी 5.5 अब्ज डॉलरचा करार केला होता. सध्या भारताकडे तीन S-400 प्रणाली कार्यरत आहेत. उर्वरित लवकरच भारतात दाखल होणार आहे.

Comments
Add Comment

#FacebookDown : जगभरात मेटासह फेसबुकची सेवा ठप्प! लॉगिन, न्यूज फीड, वेबसाइट बंद; लाखो वापरकर्ते त्रस्त

मुंबई : जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुकची ( #FacebookDown ) सेवा आज

US Visa : एफ-१ आणि जे-१ व्हिसाधारकांसाठी अमेरिकेचे नवे नियम; भारतीय विद्यार्थ्यांची वाढली चिंता

नवी दिल्ली : अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) स्थलांतराशी संबंधित एक नवा आणि कठोर नियम लागू

Jammu and Kashmir Flood : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; 8 जणांचा मृत्यू, 6 बेपत्ता; अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

Vaishno Devi Yatra : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ आणि माता वैष्णो देवी यात्रा स्थगित

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या तीव्र हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून

Meerut Husband Murder Case : विषारी साप आणि प्रेमाचा आव! प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट

20 लाखांच्या विम्यासाठी पतीच्या हत्येचा कट; पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा, तपासात धक्कादायक दावा मुंबई : उत्तर

Kailash Mansarovar Yatra : मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद; २०० हून अधिक प्रवासी अडकले

नवी दिल्ली : सीमावर्ती पिथौरागढ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ऐतिहासिक