​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले


पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान


सावंतवाडी : सावंतवाडी शहराला काल मध्यरात्री १२ च्या सुमारास भीषण वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या वादळाने शहरातील अनेक भागांत मोठे नुकसान केले असून, झाडे कोसळणे, इमारतींवरील पत्रे उडणे अशा घटनांमुळे मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.




या नैसर्गिक आपत्तीमध्ये श्री पंचम खेमराज (एस.पी.) महाविद्यालयाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीचे कौलारू छत पूर्णपणे विस्कळीत झाले, तर नवीन इमारतीवरील पत्रे कागदासारखे हवेत उडून दूरवर फेकले गेले. काही पत्रे तर तीन मजली इमारत ओलांडून कॉलेजच्या मागील बाजूला जाऊन पडले. यावरून वाऱ्याच्या वेगाची भीषणता लक्षात येते.

शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्र्याचे छत उडून थेट एस.पी. कॉलेज परिसरात कोसळले. याशिवाय इमारतीच्या काचेच्या खिडक्या फुटून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, सावंतवाडी नगरपरिषदेने नुकतीच शहरातील जुन्या पत्र्यांच्या शेडचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही सूचना दिलेली असतानाच ही घटना घडल्याने शहरात चर्चा सुरू आहे. हे छत जर मोती तलावाच्या मुख्य रस्त्याकडे कोसळले असते, तर मध्यरात्रीही मोठी दुर्घटना घडली असती.



​विद्युत पुरवठा खंडित, शहरात अंधाराचे साम्राज्य


गुरुवारी सायंकाळपासूनच तालुक्यात विजांचा लखलखाट सुरू होता आणि आंबोली परिसरात पावसाने हजेरी लावली होती. रात्री १२ वाजता जेव्हा वादळ सुरू झाले, तेव्हा खबरदारीचा उपाय म्हणून आणि तांत्रिक बिघाडामुळे शहराचा विद्युत पुरवठा सुमारे २ तास खंडित झाला होता.



​ठिकठिकाणी पडझड आणि नुकसान


​राजवाडा व शिव उद्यान: राजवाडा येथील नारळाचे झाड कोसळून संरक्षक कठड्याचे नुकसान झाले, तर शिव उद्यानातील झाडे पडल्याने सौंदर्यीकरणाला धक्का बसला आहे.


​उभाबाजार: येथील एका घरावरील पत्रा उडून शेजारील अंगणात पडला.
​जाहिरात कमानी: आरपीडी परिसरातील जाहिरात कमानीही वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत.



​मोठा अनर्थ टळला


हे वादळ रात्रीच्या वेळी आले आणि रस्त्यावर वर्दळ नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. प्राथमिक अंदाजानुसार शहरात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सकाळी उशिरापर्यंत पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम सुरू होते.

Comments
Add Comment

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात