Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा खेळ सुरुच; या राज्यांना उष्णतेसोबत अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील हवामान विचित्र होत चालला आहे, कधी कडाक्याचं ऊन तर कधी पाऊस, ऋतुचक्र बिघडत आहे आणि याचा परिणाम म्हणून उष्माघात यांसारखे त्रास जाणवू लागले आहेत. महाराष्ट्र सध्या दोन भागात विभागाला गेला आहे, एका भागात पाऊस आणि दुसऱ्या भागात ऊन. विदर्भात उष्णेतची लाट कायम असून, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे, तसेच काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे.



सूर्याचा तडाखा ४४ अंश पार


राज्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झाला असून वर्धा, अकोला, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये पारा ४४ अंशाच्या पार गेला आहे. तसेच जळगाव, नागपूर, वाशीमध्येही तापमान ४२ अंशापर्यंत पोहोचला आहे.



अवकाळी पाऊस का पडतोय


महाराष्ट्राच्या हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की, मध्य प्रदेशात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे, तसेच विदर्भा पासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. ईशान्य भारतात समुद्र सपाटीपासून १२.६ किलोमीटर उंचीवर ताशी ९० ते १२० नॉट्स वेगाने जोरदार वारे वाहत आहेत. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे.



या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा 


रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव, आणि लातूर या जिल्ह्यांत सोसाट्याचा वर आणि मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



गारपिटीचा इशारा


घाटमाथा, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



मुंबई ठाण्यात आद्रता वाढणार


पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी केवळ उष्णता नसून आद्रतेचाही त्रास होणार आहे. तसेच हलका आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा

Nitesh Rane : मत्स्य महाविद्यालयाचा तात्काळ प्रस्ताव सादर करा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

रामेश्वर-देवगड येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही

Uorfi Javed : १ रुपया तरी घेतलाय हे सिद्ध करा, अकाऊंट डीॲक्टिव्हेट करेन! सीजेपीला पाठिंबा दिल्याच्या आरोपांवर उर्फी जावेद भडकली

मुंबई : आपल्या अतरंगी फॅशन आणि रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद