पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. १५२ मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या मतदानावेळी जाळपोळ, तोडफोड आणि मारहाणीच्या घटनांनी परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.
मुर्शिदाबादमध्ये एजेयूपी प्रमुख आणि रेजीनगरचे उमेदवार हुमायून कबीर यांच्या ताफ्यावर दंगलखोरांनी काठ्या आणि विटांनी हल्ला केला. या घटनेनंतर टीएमसी आणि एजेयूपी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संघर्ष झाला. कबीर यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून पोलिसांशीही त्यांचा वाद झाला.
दक्षिण दिनाजपूरमधील कुमारगंजमध्ये भाजप उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावरही हल्ला झाल्याचा आरोप आहे. बूथ जॅमिंगची तक्रार मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सरकार यांना काही जणांनी मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पोलिस उपस्थित होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा २३ एप्रिल रोजी, तर दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत राज्य ...
मालदामध्ये ईव्हीएम बिघाडामुळे संतप्त मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्याला घेराव घालून ओलीस धरले. तसेच हरिश्चंद्रपूरमध्ये टीएमसीच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात पक्षाच्या कॅम्प ऑफिसची तोडफोड करण्यात आली.
सिलिगुरीमध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राबाहेर हाणामारी झाली. केंद्रीय दलांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या ...
जामुरिया मतदारसंघात एका बेवारस वाहनात ईव्हीएम आढळल्याच्या दाव्यामुळेही वातावरण अधिकच तापले आहे. या वाहनाजवळ कोणताही सुरक्षा कर्मचारी नसल्याने विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.