Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. १५२ मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या मतदानावेळी जाळपोळ, तोडफोड आणि मारहाणीच्या घटनांनी परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.


मुर्शिदाबादमध्ये एजेयूपी प्रमुख आणि रेजीनगरचे उमेदवार हुमायून कबीर यांच्या ताफ्यावर दंगलखोरांनी काठ्या आणि विटांनी हल्ला केला. या घटनेनंतर टीएमसी आणि एजेयूपी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संघर्ष झाला. कबीर यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून पोलिसांशीही त्यांचा वाद झाला.


दक्षिण दिनाजपूरमधील कुमारगंजमध्ये भाजप उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावरही हल्ला झाल्याचा आरोप आहे. बूथ जॅमिंगची तक्रार मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सरकार यांना काही जणांनी मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पोलिस उपस्थित होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.



कूचबिहारच्या तुफानगंज परिसरात मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय सुरक्षा दलांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवला.


मालदामध्ये ईव्हीएम बिघाडामुळे संतप्त मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्याला घेराव घालून ओलीस धरले. तसेच हरिश्चंद्रपूरमध्ये टीएमसीच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात पक्षाच्या कॅम्प ऑफिसची तोडफोड करण्यात आली.





सिलिगुरीमध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राबाहेर हाणामारी झाली. केंद्रीय दलांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.


दरम्यान, टीएमसीने राज्याबाहेरून गुंड आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. आसनसोल उत्तरचे उमेदवार मलय घटक यांनी पाच विशेष ट्रेनमधून बाहेरील लोकांना आणल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.



जामुरिया मतदारसंघात एका बेवारस वाहनात ईव्हीएम आढळल्याच्या दाव्यामुळेही वातावरण अधिकच तापले आहे. या वाहनाजवळ कोणताही सुरक्षा कर्मचारी नसल्याने विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Comments
Add Comment

CJP Protest Case : 'गुन्हेगारांना सोडणार नाही'; CJP आंदोलन प्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट विधान

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांविरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल करण्यात

Kangana Ranaut : "होय, मी मवाळ हिंदू होते; पण आता...भूतकाळातील टीकेवर कंगना रणौतचे टीकाकारांना चोख उत्तर

नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना

Supreme Court : विद्यार्थी आंदोलन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलं स्पष्टीकरण, राज्यांना फौजदारी खटले मागे घेण्याचे स्वातंत्र्य

नवी दिल्ली : दिल्लीत काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलन

Public Interest Litigation : एका पोस्टकार्डने बदलली भारतीय न्यायव्यवस्था; जनहित याचिकेचा (PIL) इतिहास आणि सद्यस्थिती

भारतीय न्यायव्यवस्थेचा इतिहास पाहताना अनेक कायदेशीर खटले, मोठे कायदे आणि वकिलांच्या युक्तिवादांची चर्चा होते.

OpenAI Astra AI : मानवी मेंदूलाही न जमलेले काम AI ने करून दाखवले! OpenAI च्या 'Astra' मॉडेलने सोडवली १० जुनी कठीण कोडी

वॉशिंग्टन : तंत्रज्ञानाच्या जगात क्रांती घडवणाऱ्या OpenAI या प्रसिद्ध कंपनीने एक अत्यंत महत्त्वाचा दावा केला आहे.

Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष

नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना महिला कुस्तीपटूंच्या