Operation Sindoor : “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही”; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने भारतीय लष्कराचे सूचक ट्विट

- भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण


मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते. या भ्याड हल्ल्याची उद्या म्हणजेच बुधवार २२ एप्रिल रोजी वर्षपूर्ती असून त्याच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने ट्विटरव (एक्स) पोस्ट करत “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही” असे सांगत ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण करवून दिली आहे.


यासंदर्भातील पोस्टमध्ये भारतीय सेनेने नमूद केले की, “जेव्हा मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा उत्तरही ठाम आणि निर्णायक असते. न्याय मिळाला आहे. भारत एकजूट आहे.” यासोबतच एका ग्राफिकमध्ये “काही मर्यादा कधीही ओलांडल्या जाऊ नयेत. भारत विसरत नाही,” असा संदेश देण्यात आला.



पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली होती. भारतीय सेनेने पाकिस्तान तसेच पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. या कारवाईदरम्यान ९ प्रमुख दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आले आणि लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद व हिज्बुल मुजाहिदीन यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. या लष्करी कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये ४ दिवस तणावपूर्ण संघर्ष सुरू राहिला. मोठे नुकसान सहन केल्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधत युद्धविरामाची विनंती केली. पाकिस्तानच्या विनवणीनंतर अखेर १० मे रोजी दोन्ही बाजूंमध्ये युद्धविरामावर सहमती झाली.







सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक करत ते स्पष्ट राजकीय निर्देशांखाली तिन्ही सैन्यदलांमधील उत्कृष्ट समन्वयाचे उदाहरण असल्याचे म्हटले होते. तसेच, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन सुदर्शन चक्र’ची घोषणा केली होती. या मोहिमेचा उद्देश शत्रूच्या घुसखोरीला आळा घालणे आणि भारताच्या आक्रमक क्षमतांमध्ये वाढ करणे हा आहे.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन