Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय, त्यामुळे पाण्याची वाफ देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणामंधील पाणीसाठा हा कमी होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात पाणीकपातीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून प्रशासनाने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.



पुण्यात मुबलक पाणीसाठा


पाणीकपाती बाबत महत्वाचा निर्णय घेताना पुणे प्रशासनाने धरणांमधील सध्या पाणीसाठ्याची आधारे घेत आकडेवारीनुसार सध्याचा साठा ११.५ टीएमसी ( ३९ % ) असून गेल्या वर्षी हा साथ १०.४ टीएमसी ( ३६ %) होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ टीएमसी पाणीसाठा अधिक असल्याने पालिकेचा पाणी कपातीला विरोध आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांची स्थिती सध्या समाधानकारक आहे.



अल निनो च्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाने पुणे पालिकेला १५ % कपात करण्याचे आवाहन केले होते. समाधानकारक पाऊस पडेपर्यंत पाणीकपात चालू ठेवण्याचा प्रस्ताव त्या पत्रात मांडण्यात आला होता. मात्र पालिकेने प्रस्ताप तूर्तास बाजूला ठेवला आहे.



पालिकेच्या म्हणण्यानुसार शहरातील अनेक भागात कमीदाबाने पाणीपुरवठा होत आहे, यावरून नागरिक प्रचंड तक्रार करत आहेत. पाणीकपात हा उपाय नसून वितरण पद्धत सुधारली पाहिजे हे नागरिकांचे मत आहे. पुण्याच्या पाणीकपातीचा निर्णय सध्या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही बैठक सध्या लांबणीवर आहे. कालवा समितीची बैठक पूर्ण झाल्यानंतरच पुण्यात पाणीकपात करायची की नाही हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Comments
Add Comment

Ashadhi Wari Accident : जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात अपघात; टेम्पोच्या धडकेत ३ वारकरी महिलांचा मृत्यू, ४ वारकरी जखमी

जेजुरी : आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळा सुरू असतानाच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी (Palkhi) मार्गावर मोठी दुर्घटना (Accident)

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची उघडीप कायम; 'या' तारखेनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून २१ जुलैनंतर पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता; जुलैअखेर चांगल्या पावसाचा अंदाज राज्यात पुन्हा एकदा

Ashadhi Wari 2026 : वारीत वाटण्यासाठी आणलेल्या शीतपेयामुळे २ परिचारिकांना विषबाधा; अन्न व औषध प्रशासनाची तातडीची कारवाई

धाराशिव : धाराशिवमध्ये शेगावच्या संत गजानन महाराजांच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. भाविकांना

Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यात चोरांचा धुमाकूळ! ६७ महिला, २२ पुरुषांसह ८९ संशयित पोलिसांच्या ताब्यात

पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात (Palkhi Procession) लाखो वारकरी

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद