Jammu and Kashmir Accident : उधमपूरमध्ये प्रवासी बस खड्ड्यात कोसळून अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून १५ वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी रामनगर परिसरातील कागोट गावाजवळ घडला. एका प्रवासी बसचा डोंगराळ रस्त्यावर ताबा सुटल्याने ती खोल दरीत कोसळली.


माहितीनुसार, ही बस दुर्गम गावातून उधमपूरकडे जात होती. यादरम्यान हा अपघात घडला आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये सरकारी कर्मचारी, शाळा व महाविद्यालयातील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास कघोट परिसरात वळण घेताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.



घटनेनंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. प्रशासन आणि पोलिसांच्या पथकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहोचवले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. परिसरात शोककळा पसरली असून प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.


अपघातानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उधमपूरच्या उपायुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि गंभीर जखमींना एअरलिफ्ट करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. मदत व बचावकार्य वेगाने सुरू असून प्रशासनाशी सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

सोमनाथ महोत्सवात काय म्हणाले PM Modi ?

सोमनाथ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोमनाथ मंदिरात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात सहभाग घेतला.

West Bengal : पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयाने 'शांतीदूतांना' धक्का ?

कोलकाता : पश्चिम बंगालमार्गे भारतामध्ये बिनबोभाट घुसखोरी अनेक वर्षे सुरू होती. पण भाजपच्या नेतृत्वात सरकार

Narendra Modi : पुढील एक वर्ष सोने खरेदीला 'ब्रेक' द्या...पंतप्रधान मोदींच्या आवाहनामागील नेमके गणित काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी १० मे २०२६ रोजी हैदराबाद (Hydrabaad) येथे एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना एक

Rajnath Singh : जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार अ‍ॅलर्ट मोडवर; राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दीड तास बैठक

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील (पश्चिम आशिया) वाढत्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत असताना, भारत सरकारने

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा: राहुल गांधींवर बोचरी टीका; म्हणाले त्यांची समजच...

नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे सध्या दिल्लीच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर असून,

Bharath Kanth : ३१ वर्षीय उदयोन्मुख तेलगू अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू; हैदराबाद मधील आउटर रिंग रोडवर ट्रकला कारची धडक

हैदराबाद : तेलुगू चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख अभिनेता भरत कांत (Bharath Kanth) याचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू