Devendra Fadnavis Slams Mamata : 'ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालला कर्जाच्या खोल दरीत ढकलले'

मुंबई : "एकेकाळी देशाची सांस्कृतिक आणि औद्योगिक राजधानी राहिलेल्या पश्चिम बंगालला ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने (टीएमसी) आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बंगाल आज 'डेट ट्रॅप'मध्ये अडकला असून, विकासकामांसाठी नव्हे तर कर्जाचे व्याज फेडण्यासाठी या सरकारला नवीन कर्ज काढावे लागत असल्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे", असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला.





भाजपच्या प्रचारासाठी कोलकाता येथे आले असता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ही निवडणूक आता भाजप विरुद्ध टीएमसी अशी राहिलेली नसून, ती ममता बॅनर्जी विरुद्ध बंगालची जनता अशी थेट लढाई झाली आहे. बंगालमधील 'कट-मनी' संस्कृती आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे उद्योजक धास्तावले आहेत. सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार ६ हजार ८९५ उद्योग बंगाल सोडून गेले आहेत. यातील सर्वाधिक उद्योगांनी महाराष्ट्राचा रस्ता धरला आहे. ५० वर्षांपासून बंगालमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्याही आता गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती देत आहेत. ममता सरकारचे नवीन उद्योगांचे दावे केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात उत्पादन सुरू होण्यापूर्वीच भ्रष्टाचारामुळे येथील उद्योगांचे कंबरडे मोडले जाते, अशी टीका त्यांनी केली.


बंगालच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण करताना फडणवीस म्हणाले की, "रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार कर्ज-जीएसडीपी प्रमाण २५ टक्क्यांच्या वर जाणे धोक्याचे लक्षण असते. मात्र, बंगालमध्ये हे प्रमाण ३९ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात इतरत्र आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू असताना, बंगालचे सरकारी कर्मचारी आजही पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगासाठी धडपडत आहेत. महसुली तूट अडीच टक्क्यांवर गेली असून सरकार केवळ स्वतःची यंत्रणा चालवत आहे, राज्य नाही."


भ्रष्टाचारात नंबर १ : "नारदा, सारदा आणि कोळसा घोटाळ्यांमुळे बंगाल आज भ्रष्टाचारात देशात प्रथम क्रमांकावर आहे. जे लोक देशात लोकशाही धोक्यात असल्याचे ओरडतात, त्यांना बंगालमधील 'कॅग' आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना दिल्या जाणाऱ्या धमक्या दिसत नाहीत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्राने दिलेल्या निधीची बंगालमध्ये उघड लूट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी सीएजीच्या अहवालाचा हवाला देत केला.


'सोनार बांग्ला'चे व्हिजन : भाजपच्या संकल्पपत्राचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, "युवांसाठी १ कोटी रोजगार आणि महिलांसाठी दरमहा ३ हजार रुपयांची 'सन्मान निधी' योजना भाजप राबवेल. घुसखोरीवर पूर्णपणे लगाम लावून आणि सुशासनाच्या बळावर पुढच्या ५-७ वर्षांत बंगालला पुन्हा 'इंडस्ट्रियल पॉवरहाऊस' बनवून 'सोनार बांग्ला'चे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच पूर्ण होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

Jalgaon Crime : जराही दया आली नाही, सासूने अंध महिलेला तिच्या साडेतीन वर्षांच्या अंध मुलासह विहिरीत दिले ढकलून ; कटातही पतीचाही सहभाग असल्याचा आरोप

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात किनगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी पोलिसांना शेतात

IND vs ENG ODI : इंग्लंडचा मोठा डाव! सलामीची जोडी पुन्हा बदलली; भारताविरुद्ध तीन फिरकीपटूंवर मोठा विश्वास

मुंबई : भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या अंतिम ११

FIFA World Cup 2026 : गोल, ग्लॅमर आणि अब्जावधींची कमाई! मेस्सीपासून एम्बाप्पेपर्यंत सुपरस्टार्सच्या प्रेमकथा आणि संपत्तीची चर्चा

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून जागतिक क्रमवारीतील अव्वल चार संघांनी उपांत्य

Donald Trump : "आम्हीच होर्मुझचे रक्षक असल्याने आता आम्ही २०% सुरक्षा शुल्क आकारणार"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी घोषणा करत जागतिक

BMC News : महापालिका मालमत्तांच्या कागदी नोंदी, कोट्यवधी रुपयांचा बुडताे महसूल

- मालमत्तांसाठी केंद्रीकृत डिजिटल नोंदणी, जीआएस आधारीत प्रणाली करा विकसित - भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी

DCM Eknath Shinde : ठाण्यातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स तत्काळ हटवून स्ट्रक्चरल ऑडिट करा

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; होर्डिंग दुर्घटनेची घेतली गंभीर दखल मुंबई : ठाण्यात सोमवारी घडलेल्या